वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशमध्ये प्रत्येकवर्षी मान्सुन पावसाच्या हंगामामध्ये मोठे नुकसान होत असते. मुसळधार पावसामुळे अनेक लोक मरण पावतात. बांगलादेशमध्ये एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान मान्सुन पावसाळी हंगामात आत्तपर्यंत बळींची संख्या 350 झाली आहे. येथील स्टेडियममध्ये फुटबॉल खेळत असताना वीजेचा धक्का लागून दोन युवा क्रिकेटपटू ठार झाले.
या दुर्घटनेत मरण पावलेल्या क्रिकेटपटूंची नावे मोहम्मद नदीम आणि मिझानू
र रेहमान अशी आहेत. या स्टेडियममध्ये 16 वर्षे वयोगटीतील हे युवा क्रिकेटपटू फुटबॉल खेळत असताना प्रचंड आवाजाने वीज या स्टेडियमच्या मैदानात कोसळली. या दोन क्रिकेटपटूंना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.