वार्ताहर / शिये
वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी करवीरच्या पश्चिम भागातील शिवसेनेच्यावतीने केर्ले (ता. करवीर) येथील उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता ऋषीकेश खांबे यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन असल्यामुळे उद्योग-धंदे बंद आहेत. त्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच महावितरण कंपनीने वीज बिलात वाढ करून त्यांना शॉकच दिला आहे. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी आणि लॉकडाऊनच्या काळातील बिले माफ करावीत. तसेच काही ही लोकांची वीज बिले थकित आहेत. त्यांचे कनेक्शन वीज मंडळाने तोडू नये. काही ग्राहकांचे तोडले असल्यास ते त्वरित जोडावे अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवसेना करवीर महिला आघाडी प्रमुख वंदना पाटील, विभाग प्रमुख भिमराव पाटील, युवा सेना करवीर तालुका प्रमुख पवन तोरस्कर, महेश सुतार, मारुती माने, संपत भोसले (केर्ले) अनिल पाटील , महादेव पाटील, महेश गवसे यांच्यासह निगवे दुमाला रजपूतवाडी सोनतळी केरले केरले पडवळवाडी या भागातील नागरिक आणि शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.