इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील-किणीकर यांचा इशारा
उच्च दाब पाणीपुरवठा संस्थांच्या वीज बिलात चौपट वाढ
वीज बिल सवलतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
प्रतिनिधी / कोल्हापूर :
उच्चदाब पाणीपुरवठा सहकारी संस्थांच्या वीज बिलात महावितरणने प्रतियुनिट 4.25 रूपये (वहन आकारासहीत) दरवाढ केली आहे. त्यामुळे या संस्थांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शासनाकडे दरवाढ रद्द करण्याची मागणी करणार आहे. याबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण शासनपातळीवरून याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास रस्त्यावरची लढाई केली जाईल, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे संपर्कप्रमुख विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला आहे.
महावितरणने उच्च दाब पाणीपुरवठा संस्थांच्या वीज बिलात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर पदवीधर आमदार अरुण लाड, संजय घाटगे, वीजतज्ञ प्रताप होगाडे, विक्रांत पाटील-किणीकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिह्यातील संस्थाचालकांची नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये वीज बिल सवलतीबाबत चर्चा करण्यासाठी शासनाकडे वेळ मागितली आहे. जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर या जिह्यातील तिन्ही मंत्र्यांनी वीज बिलात सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी इरिगेशन फेडरेशनची विनंती आहे. यामध्ये सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग खुला आहे.
सरकारचा दुजाभाव
राज्यात अनेक ठिकाणी मोठÎा नद्यांतून पाणीउपसा करून कॅनॉलद्वारे शेतीसाठी पुरवले जाते. हा पाणीउपसा करणाऱया कृषीपंपांचे 81 टक्के वीजबिल सरकार भरते. आणि 19 टक्के शेतकरी भरतात. मग अनेक छोटे-छोटे शेतकरी एकत्र येऊन, कर्ज काढून उच्चदाब पाणीपुरवठा सहकारी संस्था उभारतात. 10 ते 12 किलोमीटर अंतरावर चार टप्प्यांत पाणी उचलून शेतीला पाणीपुरवठा करतात. त्या संस्थांच्या वीजबिलात चौपट वाढ करून शासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप संबंधित शेतकऱयांकडून केला जात आहे.