मुलांना शाळेत पाठवण्याचे खानापूर गटशिक्षणाधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात वीट व्यवसाय चालतो. विटा तयार करण्यासाठी कामगार दाखल झाले आहेत. या मजुरांच्या मुलांसाठी सिंगिनकोप येथील मंगल कार्यालयात शिक्षणाची सोय केली आहे. खानापूर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी वारंवार या कामगारांची भेट घेऊन मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्याची जबाबदारी सीआरपी व बीआरसीवर सोपवली आहे. कामगारांची मुले शाळेत न पाठविल्यास वीट उत्पादकांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
तालुक्मयात 20 शाळांत मिळून गतवषी 336 मुले शिक्षणाच्या मुख्यः प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना यश मिळाले होते. यासाठी सीआरपी व बीआरसी शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या शाळेत मुलांना दाखल करण्याचे आवाहन खानापूर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी केले आहे.
गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बिदरभावी, निडगल, बरगाव, सन्नहोसूर, गणेबैल, इदलहोंड, खेमेवाडी, निट्टर, प्रभूनगर, सिंगीनकोप, झाडअंकले, माळअंकले, हत्तरगंजी, मुडेवाडी, गांधीनगर येथील शाळांतदेखील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
तालुक्मयात वीट कामगारांच्या मुलांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये 350 विद्यार्थी शालाबाहय़ आढळले. त्यामध्ये सहावी ते आठवीत शिकणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. अशी माहिती सीआरपी गोविंद पाटील यांनी दिली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पालकांची भेट घेण्यात आली. त्याचबरोबर वीट उत्पादक मालकांची भेट घेऊन मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात
आले.
मार्चपर्यंत वीट कामगार शेतवडीत वस्तीला असतात. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे शिक्षण खात्याने ही बाब गांभीर्याने घेतली
आहे.