बेळगाव : प्रत्येक वषी पावसाळय़ात वीरभद्रनगर, शिवाजीनगर, आसदखान सोसायटी अशा विविध परिसरात पाणी साचते. या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी सातत्याने करूनही महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. सदर समस्येचे निवारण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा मागणीचे निवेदन एमआयएम संघटनेच्यावतीने महापालिकेला देण्यात आले. पावसामुळे विविध ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. याचा फटका वीरभद्रनगर परिसरालादेखील बसत आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने दरवषी रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. या परिसरातील काही घरांच्या सभोवती पाणीच पाणी होते. रहिवाशांना नाहक त्रास होत असल्याने येथील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. महापालिका आयुक्त रजेवर असल्याने अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleनव्या मंत्र्यांच्या नावांची आज होणार घोषणा
Next Article जायंट्स मेनचा 35 वा वर्धापनदिन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.