वृत्तसंस्था/ मुंबई
लंकेच्या दौऱयामध्ये रविवारपासून सुरू होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ व्यवस्थापनाने कर्णधार शिखर धवनसमवेत सलामीला पृथ्वी शॉ ची निवड करावी, असे प्रतिपादन भारताचा माजी क्रिकेटपटू वूरकेरी रमणने केले आहे. मुंबईच्या नवोदित शॉ ला चांगल्या कामगिरीसाठी पुरेशा संधी देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला ऍडलेडच्या पहिल्या कसोटीनंतर संघातून वगळण्यात आले होते. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये शॉ ने फलंदाजीत आपले सातत्य दाखविताना धावांचा पाऊस पाडला आहे. या कामगिरीमुळे निवड समितीला पृथ्वी शॉ ला संघात स्थान द्यावे लागले आहे. पृथ्वी शॉ च्या फलंदाजीमध्ये वेगळे तंत्र पाहवयास मिळते. शॉ ला निवड समितीकडून शक्यतो अधिक संधी उपलब्ध कन देणे भविष्यकाळाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असे रमणने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.
बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी रमण निगडीत असल्याने अनेक नवोदित क्रिकेटपटूंच्या क्षमतेची त्यांना माहिती आहे. पृथ्वी शॉ हा दर्जेदार फलंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघामध्ये सलामीच्या फलंदाजीसाठी आता पडीकल, गायकवाड, शॉ यांच्यात चुरस निर्माण झाली आहे पण आपला पाठिंबा शॉ ला राहील, असेही रमण यांनी ठामपणे सांगितले आहे.