साटरे, करंझोळ, करमळी, झरमेतील कोसळलेल्या डोंगरामुळे परिस्थिती ऐरणीवर
उदय सावंत / साटरे
डोंगराळ भागात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड, जंगलाची जाळपोळ केल्यामुळे डोंगर उघडे पडू लागलेले आहेत. यामुळे या डोंगराळ भागात पाणी धारण करण्याची क्षमता झालेली आहे. यंदा सत्तरी तालुक्मयात चार ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले. इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा भयानक प्रकार घडलेला आहे. येणाऱया काळात जलसिंचन खाते व वनखात्याने संयुक्तरित्या उपाययोजना करण्यावर लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सत्तरी तालुक्मयातील झरमे, करंझोळ, साटरे व करमळी बुद्रुक या चार ठिकाणी डोंगर कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे. साटरे गावात मोठे भूस्खलन झालेले आहे. एकूण प्राप्त माहितीनुसार जवळपास 3.50 कि.मी डोंगर पूर्णपणे खाली आला असून जंगल संपत्तीची हानी झालेली आहे.
जलसिंचन खात्याच्या पथकाकडून पाहणी
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी याबाबत निर्देश दिल्यानंतर वाळपई जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे व कनिष्ट अभियंता आझीझ शहा यांनी प्रत्यक्षपणे भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 3.50 कि.मी. डोंगर पूर्णपणे खाली आलेला आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात जमिनीवर मातीचा थर पसरला असून यामध्ये लाखो झाडांची नुकसानी झालेली आहे.
अहवाल वरिष्ठाना सादर करणार : पोकळे
या संदर्भात सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जवळपास 6 कि. मी. चालत जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. प्रचंड प्रमाणात डोंगर कोसूळ खाली आलेला आहे. यामुळे मोठी वृक्ष हानी झाली आहे. याबाबत प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी निर्देश दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असून अहवाल त्याना सादर करण्यात येणार आहे.
वृक्षतोड, जाळपोळ महत्त्वाची कारणे
दरम्यान यासंदर्भात कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर सत्तरी तालुक्मयातील डोंगराळ भागात वृक्षतोड व जाळपोळीचे प्रकार होऊ लागलेले आहेत. यामुळे या गंभीर घटना घडू लागल्या आहेत. डोंगराळ भागात शेकडो वर्षाची वृक्ष होती. या वृक्षाच्या विस्तारलेल्या मुळामुळे माती घट्ट पकडण्याची क्षमता होती. आज वृक्षतोड झाल्यामुळे माती ठिसूळ होऊ लागलेली आहे. डोंगराच्या माथ्यावरून खाली येणाऱया पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोंगराची माती खाली येऊन भूस्खलन सारखे प्रकार घडू लागले आहेत.
काजू बागायतीची हानी : भानुदास पवार
दरम्यान या प्रश्नी स्थानिक नागरिक भानुदास पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्तरी तालुक्मयात 23 व 24 जुलै रोजी पाण्याची पातळी वाढल्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली. आठ दिवसानंतर या गावातील ग्रामस्थ काजू बागायतीत गेले असता हा प्रकार उघडकीस आला. साटरे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. याचे निश्चित कारण सांगता येत नाही. गावातील काजू बागायतीची नुकसानी झाले आहे.
दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणाम वारंवार उद्भवणार : राजेंद्र केरकर
दरम्यान सध्या घडलेल्या चारही घटना पूर्णपणे मानवी निर्मित आहेत तसेच मोठय़ा प्रमाणात पडलेला पाऊसही जबाबदार आहे. साटरे येथे मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले आहे. करंझोळ व करमळी बुद्रुक या ठिकाणी भूस्खलन झाले यामागचे कारण विशद करताना कर्नाटक राज्यातील चिखली, पारवड या भागात मोठय़ा प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह वाट्टेल त्या दिशेने गेला व भूस्खलन सारखे प्रकार घडले. साटरे येथे वृक्षतोड व जंगलांची जाळपोळ ही दोन प्रमुख कारणे आहेत. जवळपास तीस वर्षांपूर्वी वनखात्याने सामाजिक वनीकरण या कार्यक्रमाअंतर्गत अकेशिया, निलगिरी या विदेशी झाडांची लागवड डोंगराळ भागात केली. या जागी स्थानिक जंगली झाडे लावली असती तर हा प्रकार आज घडला नसता. विदेशी झाडांची लागवड सत्तरी तालुक्मयाच्या मुळावर आता येऊ लागली आहे. याबाबत उपाययोजना म्हणून डोंगराळ भागात मातीचे बंधारे बांधणे अत्यंत गरजेचे आहे. तसे केल्यास खाली येणारा गाळ रोखला जाणार व भूस्खलन सारखे प्रकार घडणार नाहीत. यासाठी जलसिंचन खाते व वनखात्याने संयुक्तरित्या आखणी करणे काळाची गरज बनलेली आहे. अन्यथा येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयात वारंवार अशा प्रकारच्या भूस्खलनाचे प्रकार घडू शकतील, असे राजेंद्र केरकर म्हणाले.