औरंगाबाद / प्रतिनिधी :
हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱया रोहित वेमुला या संवेदनशील तरुणास विद्यापीठ प्रशासन व शासनाच्या मनुस्मृतीग्रस्त मानसिकतेमुळेच प्राणास मुकावे लागले,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व स्वराज अभियानाचे सुभाष लोमटे यांनी केले.
रोहित वेमुला यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त नारळीबाग येथे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी समाजवादी जनपरिषदेचे ऍड. विष्णू ढोबळे, मुकुल निकाळजे, बुद्धप्रिय कबीर उपस्थित होते. रोहित हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने मार्गक्रमण करणारा संवेदनशील विद्यार्थी होता.