अंमलबजावणीविना मामलेदार पिमढरले माघारी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी वेळूस येथील रवळनाथ देवस्थानाच्या कुलूप वादासंदर्भात पुन्हा एकदा वाद उफाळून आला. मामलेदार दशरथ गावस यांनी कुलूप उघडण्याचा निर्णय दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यास सोमवारी गेलेल्या मामलेदार यंत्रणेला गावकर समाजाच्या आक्रमक पवित्र्यामुळे ही कारवाई लांबणीवर टाकण्याची वेळ आली.
मामलेदार दशरथ गावस यांनी सुनावणी वेळी देवस्थानचे कुलूप उघडून चावी देवाची पूजा-अर्चा करणाऱया महाजन गटाकडे देण्यात याव्यात असा आदेश दिला होता. या आदेशाला गावकर समाजाने एक निवेदन सादर करून हरकत घेतली होती. तर दुसऱया बाजूने गुरव समाजाने मामलेदाराच्या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब करावी अशी मागणी केली होती.
सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मामलेदार कौशिक देसाई व संयुक्त मामलेदार साईश नाईक, तलाठी तुळशीदास मांदेकर यांनी सोमवारी देवस्थानाचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकर समाजाने तीव्र आक्षेप घेतला व आमच्या मागण्या संदर्भात गांभीर्याने विचार न झाल्याचा गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला. यामुळे मामलेदार यंत्रणेसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली व शेवटी कुलूप उघडण्याचा ऐवजी मामलेदार यंत्रणेला माघारी परतावे लागले.
दरम्यान मामलेदार दशरथ गावस यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मामलेदार कार्यालयाच्या यंत्रणेने पूर्वतयारी केली होती. याचा सुगावा लागताच गावकर समाजाची मंडळी मंदिर परिसरात जमली व कुलूप उघडण्यासाठी आलेल्या मामलेदार कार्यालयाच्या यंत्रणेला रोखून धरले. जोपर्यंत आमच्या वादावर समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत देवस्थानाचे कुलूप उघडू देणार नाही असा पवित्रा गावकर समाजाने घेतला. मामलेदारांना कुलूप उघडायचे असेल तर दरवाजाच्या चाव्या देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडे द्याव्यात अशी मागणी गावकर समाजाने केली. मात्र याला कौशिक देसाई यांनी विरोध दर्शविला. यामुळे देवस्थानाचे कुलूप उघडण्याचा ऐवजी त्यांना माघारी फिरावे लागले.
जोपर्यंत देवस्थानाचा तुळशीविवाह होत नाही तोपर्यंत गुरव समाज आपला तुळशीविवाह करीत नाहीत. यामुळे गांभीर्याने विचार करून मामलेदार कौशिक देसाई यांनी दरवाज्याचा उघडून पूजा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गुरव समाजाने केली. या संदर्भाची पूर्ण माहिती प्राप्त करून घेतल्यानंतर मामलेदार कौशिक देसाई यांनी या संदर्भाचा निर्णय चार दिवसांमध्ये करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. पारंपारिक पद्धतीप्रमाणे तुळशी विवाह करण्यासाठी पाच दिवसांची मोकळीक असते. यामुळे दोन दिवसात संदर्भाचा आदेश देऊन देवस्थानचे कुलूप उघडल्यानंतर विवाह करण्याची प्रक्रिया करणे शक्मय असल्याचे कौशिक देसाई यांनी सांगितले.
दरम्यान देवस्थानच्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आला होता.