वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील वेळूस येथील रवळनाथ देवस्थानाच्या दरवाज्याला कुलूप लावल्यानंतर आता सोमवारी होणाऱया बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. देवस्थानच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या देवस्थानाच्या दरवाज्याला कुलूप लागले आहे. गावकर व गुरव या दोन महाजन गटामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांची दरीच्या पार्श्वभूमीवर मामलेदार दशरथ गावस यांना कुलूप लावावे लागले. सध्यातरी देवस्थानच्या परिसरामध्ये शुकशुकाट पसरलेला आहे.
याबाबतची माहिती अशी की, रवळनाथ देवस्थानात गेल्या दहा वर्षापासून दोन महाजन गुरव व गावकर यांच्या दरम्यान अधिकार पदावरून वाद निर्माण झालेला आहे. गेल्या दहा वर्षापासून सदर वाद सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार कार्यालयात प्रलंबित राहिलेला आहे. हा वाद यापूर्वी सुटला असता तर आज देवस्थानच्या दरवाज्याला कुलूप लावण्याची पाळी आली नसती अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. दहा वर्षापर्यंत हा वाद निकालात येऊ शकत नाही ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. सत्तरी तालुक्मयाच्या अनेक देवस्थानांमध्ये असे वाद निर्माण झालेले आहेत. सदर वाद जलदगतीने निकालात काढणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा देवस्थानाच्या कार्यकालावर याचा अनिष्ट परिणाम होत असतो. दरम्यान दसरा उत्सवाच्यावेळी निर्माण झालेले मतभेद व त्यानंतर देवस्थानाला ठोकण्यात आलेल्या टाळ्य़ामुळे देवस्थान परिसरामध्ये पूर्णपणे शुकशुकाट पसरलेला आहे. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला दिसत आहे.
सोमवारी दोन्ही गटात दरम्यान महत्त्वाची बैठक बोलविण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा होऊन देवस्थानाचा दरवाजा उघडण्याची आशा निर्माण झालेली आहे. यामुळे सोमवारी होणाऱया बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.
वाद 10 वर्षे प्रलंबित का? रवळनाथ देवस्थान हे फक्त वेळूस गावापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर वाळपईवासियांचे हे श्रद्धास्थान आहे. दरवषी मोठय़ा प्रमाणात कालोत्सव साजरा होत असतो. दोन दिवस प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या तिन्ही धर्मियांचे लोक या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात मात्र गुरव व गावकर या दरम्यान वाद निर्माण झालेला आहे. देवस्थानाच्या पारंपरिक कार्यक्रमांमध्ये गुरव समाज, गावकर समाजाला सहभागी करून घेत नाही. यामुळे गेल्या दहा वर्षापासून सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार कार्यालयात हा वाद प्रलंबित आहे. एरव्ही देवस्थान म्हटले की वाद जलदगतीने निकालात काढणे गरजेचे असते. मात्र दहा वर्षे हा वाद प्रलंबित राहिल्यामुळे या देवस्थानाच्या धार्मिक अधि÷ानावर परिणाम