गुरव समाजाच्या हरकतीमुळे सभेत गोंधळ
प्रतिनिधी /वाळपई
वेळूस येथील सुप्रसिद्ध रवळनाथ देवस्थानच्या कार्यकारी समितीच्या निवडीवर गावकर समाजाने पूर्णपणे प्राबल्य प्राप्त केले आहे. या समितीची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू असताना गुरव समाजाने याला तीव्र आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित असलेल्या सरकारी यंत्रणेने याची दखल घेतली नाही. गुरव समाजाची हरकत ही पूर्णपणे बेकायदेशीर असून विडणुकीची प्रक्रिया रोखता येणार नसल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. त्यानंतर घेतलेल्या निवडणुकीत गावकर समाजाच्या सर्व प्रतिनिधी वेगवेगळय़ा पदावर नियुक्त झाले. यावेळी मोठय़ा प्रमाणात गावकर व गुरव समाजाचे महाजनाची उपस्थिती होती. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गेल्या अनेक वर्षापासून वेळुस देवस्थानाच्या गावकर व गुरव महाजनात निर्माण झालेल्या मतभेदामुळे निवडणूक महत्वाची मानण्यात येत होती. रविवारी सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर याला गुरव समाजाने आक्षेप घेतला. ही निवडणूक बेकायदेशीर असून रोखण्यात यावी अशी मागणी गुरव समाजाने केली असता उपस्थित अधिकारी गुरूदास गावस व तलाठी तुळशीदास मांदेकर यांनी निवडणुकीची प्रक्रिया ही कायदेशीर असून गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. याची जाहीर नोटीस यापूर्वी प्रसारित केलेली आहे. त्याचप्रमाणे पात्र महाजनाची यादी यापूर्वी जाहीर करण्यात आलेली आहे. हरकत असल्यास यापूर्वी घेणे गरजेचे होते मात्र गुरव समाजाने कोणती हरकत घेतलेली नाही. यामुळे आता निवडणूक सुरू असताना त्यावर आक्षेप घेणे बेकायदेशीर असल्याचे गुरुदास गावस यांनी स्पष्ट केले.
समितीवर गावकर समाजाचे पूर्ण प्राबल्य
निवडणुकीची प्रक्रीया हाती घेण्यात आल्यानंतर वेगवेगळय़ा पदासाठी गावकर समाजाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. फक्त गावकर समाजाच्या उमेदवारानी अर्ज दाखल केल्यामुळे शेवटी पात्र उमेदवारांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. निवडण्यात आलेल्या समितीवर राजाराम गावकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समितीचे इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः उपाध्यक्ष-भारत काशिनाथ गावकर, सचिव-पोतो जयराम गावकर, सहसचिव-महादेव कृष्णा गावकर, खजिनदार-तुळशिदास गणेश गावकर, उपखजिनदार-बाळकृष्ण साजरो गावकर, अँटर्नी–बाबाजी आंनद गावकर, सहअँटर्नी–नितेश काशिनाथ गावकर.
दरम्यान, गावकरी मंडळी समाजाचे मंडळी सर्व पदावर निवडून आल्यानंतर समाज मंडळींनी आनंद व्यक्त केला. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.