सातारा / प्रतिनिधी :
वेळे, (ता.जावली) या गावातील 75 खातेदारापैंकी केवळ 12 खातेदारांचे पुनर्वसन पळस्पे (ता. पेनवेल जि. रायगड) येथे करण्यात आले आहे. याला वेळे ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला असून, या जमीनीची वाटणी सर्व स्थानिक खातेदारांमध्ये समान व्हावी. कारण डोंगर खचल्यामुळे पुन्हा मोठी दर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरीत जमीन माने कॉलनी, भोळी व धनगडवाडी, खंडाळ येथे देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतीच केली.
प्रारंभी वनविभागातर्फे रायगड येथे खातेधारकांना जमीन उपलब्ध नसल्याने सातारा जिल्ह्यात जमीन देण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार सर्व खातेधारकांनी याला सहमती दिली. पण आता केवळ 12 खातेधारकांना पळस्पे, पनवेल येथे जमीन देण्यात येत असल्याचे कळण्यात आले आले आहे. काही लोकांच्या हितसंबंधांमुळे बेकायदेशीर रित्या केवळ ठरविक खातेधारकांना जमीन देण्यात येत असल्याने याला कडाडून विरोध करण्यात येत आहे. तसेच खातेदारांना जमीनीचे समान वाटप करण्यात यावे, अन्यथा अमरण उपोषणाचा इशार यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी धर्मेद्र जाधव, किसन जाधव, सिताराम जाधव, मारूती पावार, बबन जाधव, तुकाराम जाधव, सरपंच कासाबाई पवार आदी उपस्थित होते.