जयप्रकाश परब यांची माहितीः ‘घर तिथे शोषखड्डा’ योजनेला जनतेचा प्रतिसाद
प्रतिनिधी / वैभववाडी:
जलशक्ती अभियान 2021- 2022 अंतर्गत ‘घर तिथे शोषखड्डा’ या योजनेच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्मयात एकाच दिवशी तब्बल एक हजार 250 शोषखड्डे मारण्याची किमया वैभववाडी पंचायत समितीने साधली आहे. या योजनेला गावागावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता तालुक्मयात लवकरच शंभर टक्के शोषखड्डय़ाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव योजनेच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शोषखड्डा मारल्यानंतर संबंधित लाभार्थ्याला 2,350 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी जॉबकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, असेसमेंट अशी कागदपत्रे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी परब यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या संयुक्त सभेत शोषखड्डा मारण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी उपस्थित होते. नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे एकाच दिवसात एक हजार 250 शोषखड्डे मारणे शक्मय झाले आहे.
सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येकाची
ही मोहीम राबविण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी, क्षेत्रिय अधिकारी विशाल चौगुले, सुधाकर जाधव, लक्ष्मण हांडे, प्रकाश अडुळकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. घरातील सांडपाणी व्यवस्थापन नीटनेटके करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे परब यांनी सांगितले.