योगऋषी रामदेवबाबा यांचे प्रतिपादन : आझाद मैदानावरील शानदार सोहळ्यात आयुर्वेद संशोधक आचार्य बाळकृष्णी यांना ‘लोकमान्य मातृभूमी पुरस्कार’ प्रदान
पणजी : आम्हाला भारताला परम वैभवशाली बनवायचे आहे, असे केवळ नारेबाजी आणि घोषणा देऊन चालणार नाही. त्यासाठी प्रथम स्वत: वैभवशाली बनले पाहिजे. त्यादृष्टीने वैभव उभे करावे लागेल. तेसुद्धा स्वत:साठी-स्वार्थासाठी नव्हे तर परमार्थ आणि भारतमातेसाठी करावे लागेल. हेच कार्य पतंजलीच्या माध्यमातून आचार्य श्रद्धेय बाळकृष्ण महाराज यांच्याकडून चालले आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेव महाराज यांनी केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. तर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या ’लोकमान्य मातृभूमी पुरस्कार 2023’ च्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर त्यावेळी आचार्य बाळकृष्ण महाराज, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर आदींची उपस्थिती होती. अन्य मान्यवरांमध्ये पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सौ. ब्राह्मीदेवी, कमलेश बांदेकर, सई ठाकूर बिजलानी, प्रितम बिजलानी, आदींची उपस्थिती होती.
पुरस्काराची रक्कम दिली गोव्यातील गोसेवसाठी
मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि 10 लाख अशा स्वऊपातील पुरस्काराने आचार्य बाळकृष्ण यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कारनिधी नंतर त्यांनी त्यात स्वत:चे पाच लाख ऊपये जोडून एकुण 15 लाख ऊपये गोव्यात गोसेवेसाठी चाललेल्या कार्यासाठी कृतज्ञतापूर्वक सुपूर्द केला. त्यावेळी बोलताना, गोव्यात गोमातेच्या सेवेसाठी चाललेले कार्य संपूर्ण देशाने आदर्श घेण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पुढे बोलताना स्वामी रामदेव महाराज यांनी, गोव्याची खरी ओळख योगभूमी हीच असून तीच भगवान परशुरामाची भूमी आहे व तीच गोमातेची, सनातन धर्माचीही भूमी आहे, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते, त्याच तोडीचे कार्य आज तपोभूमीच्या माध्यमातून गोव्याच्या बहुजन समाजाची सनातन धर्मात निष्ठा वाढविण्याच्या दृष्टीने चालले असून त्या कार्याला तोड नाही, असे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत…
पुढील 25 वर्षांत जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार तेव्हापर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यात यशस्वी ठरू असा संकल्प कऊया, असे प्रतिपादन रामदेवबाबा यांनी केले. देशाला एवढा स्वस्थ, समृद्ध, संस्कारवान, एवढा वैभवशाली बनवुया की जगातील सर्व देशांना मागे टाकून भारत हा जगातील सर्वात मोठी आर्थिक, सामाजिक, राजकीय महासत्ता बनलेली असेल, असे ते पुढे म्हणाले.
आचार्यांचे कार्य भारतरत्नच्या तोडीचे
आचार्य बाळकृष्ण यांच्याबाबत बोलताना स्वामी रामदेव यांनी त्यांच्या व्यक्तीत्वाच्या प्रत्येक पैलुवर प्रकाश टाकला. आज आम्ही क्रिकेटमधील चौकार-षटकारांसाठी सचिन तेंडुलकर, आणि संगीतातील प्रतिभेसाठी लता मंगेशकर यासांरख्या अनेकांना ’भारतरत्न’ सारखे पुरस्कार दिले आहेत. परंतु आचार्यांच्या एकेका कार्याची व्याप्ती पाहिल्यास त्यांचे प्रत्येक कार्य भारतरत्नाच्या तोडीचे आहे, असे ते म्हणाले.
जगाला आदर्श ठरेल ’वैदीक टॅक्सोनॉमी’
आचार्य बाळकृष्ण यांच्या सध्या चाललेल्या कार्याची तर आतापर्यंतच्या जगातील सर्व ऋषीमुनींच्या कार्याशीसुद्धा तुलना होऊ शकणार नाही एवढे महान आहे. आतापर्यंतच्या सर्व ऋषीमुनींचे कार्य केवळ 700 जडीबुटींच्या शोधापर्यंतच मर्यादित राहिले. महापुऊष आचार्यांनी ते 7000 पर्यंत नेण्याचे महान कार्य केले आहे. संपूर्ण जगाला आदर्श ठरेल अशी ’वैदीक टॅक्सोनॉमी’ तयार करण्याचे कामही त्यांनी केले आहे. प्रवृत्तीत राहून निवृत्तीत राहणे, सर्व काही पुऊषार्थ-परमार्थासाठी करणे, यासारखे असंख्य गूण प्रत्येकाने त्यांच्याकडून आत्मसात केले पाहिजेत.
पतंजली समूहात आज तेच सर्वेसर्वा असून सध्या त्यांनी हा व्यवसाय 40 हजार कोटीपर्यंत पोहोचवला आहे व भविष्यात 1 लाख कोटीपर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय असून यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते, असे ते म्हणाले.
योगासाठी जीवन समर्पणाचे स्वामींचे कार्य अजोड : श्रीपाद नाईक
महाशिवरात्री, शिवजयंती आणि योगशिबीर तेही स्वत: योगगुरू रामदेव बाबा यांच्या पावन मार्गदर्शनाखाली गोव्यात होत आहे, हा खरोखरच दुग्धशर्करा योग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. योग आणि शिव यांचा सुरेख संगम म्हणजे आदीयोगी. त्या पार्श्वभूमीवर मांडवी किनारी संपन्न झालेल्या सोहळ्यास आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. अशा या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी होण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे, असे नाईक म्हणाले. स्वामीजींनी ज्याप्रकारे योग आणि आयुर्वेदासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याला तोड नाही, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
ऋषीपदाचा सच्चा सेवक बनावे एवढीच प्रार्थना
मी कुणी ऋषीमहर्षी बनलो नसलो तरी ऋषीपदाचा सच्चा सेवक बनावे, एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे, अशा नम्रतेच्या शब्दात आचार्य बाळकृष्ण यांनी बोलण्यास सुऊवात केली. महाशिरात्रीच्या पावन पर्वावर आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी गोव्यात येण्याचा संयोग जुळून आला यासाठी त्यांनी स्वत:ला सुदैवी संबोधले.
यापूर्वी युरोप, चीन आदी देशांमधील लोक हजारो जडीबुटींच्या औषधांचा शोध लावल्याचा दावा करत होते तेव्हा भारतात केवळ 700-800 जडीबुटीच होत्या. या विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हा औषधी गुणधर्म असलेल्या 7 ते 8 हजार वनस्पती आढळून आल्या. एवढेच नव्हे तर याच दरम्यान जगभरातील अन्य वनस्पतींचाही अभ्यास केला तेव्हा 3.60 लाख प्रकारच्या वनस्पतींमधून सुमारे 60 हजार प्रकारच्या औषधी वनस्पती आढळल्या. त्यांना पतंजलीच्या माध्यमातून औषध म्हणून मान्यता देण्याचे काम केले. असे कार्य आतापर्यंत जगात कुठेच झालेले नाही, असे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले.
त्याचबरोबर आता आम्ही विश्व वनस्पती संहिता लिहीत असून सुमारे 2.25 लाख श्लोकांचा हा ग्रंथ जगातील सर्वात मोठा ग्रंथ बनणार आहे. त्याद्वारे भारतीय वनसंपदेलाही जगात ओळख मिळेल. तसेच भविष्यात कोणताही देश याच वनसंपदेसाठी स्वत:च्या नावे पेटंट मिळवू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
जुळून आला योगायोग
आचार्य बाळकृष्ण यांनी प्रमोद सावंत यांना वैद्य म्हणून संबोधले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांना त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर पतंजली आयुर्वेद, आयुष मंत्रालय आणि लोकमान्य सोसायटी या तिघांचीही स्थापना वर्ष 1995 मध्येच झाली हा आगळा योगायोगही त्यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिला तेव्हाही उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. श्रीपाद नाईक यांच्या देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांना आपले ’थोरले बंधू’ म्हणून उल्लेख केला. तसेच देशाचे प्रथम आयुषमंत्री म्हणून त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद राहील असेही ते म्हणाले.
पतंजलीच्या कार्याला तोड नाही : मुख्यमंत्री
देशात आज आयुर्वेदावर चाललेल्या संशोधनात पतंजलीच्या कार्याला तोड नाही. हरिद्वारच्या त्या देवभूमीत रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्यातर्फे चाललेले हे कार्य पाहता चरक, सुश्रूत आणि वाग्भट यांच्यानंतर बाळकृष्ण महाराज यांचे नाव घेतले जाईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले.
गोवा ही सध्या योगभूमी बनण्याच्या मार्गावर असून ’सन, सँड, सी’ यांना बरोबरीनेच स्पिरीच्युअलिटी आणि सॉफ्टवेअर ही नावेही जोडली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. बाबा रामदेव यांच्या सहकार्याने गोव्यात व्हेलनेस टुरिझम वाढविण्याचेही प्रयत्न असून त्याद्वारे येथे येणाऱ्या पर्यटकांना हेल्थ, व्हेलनेस आणि योग यांचाही लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गोवा ही योगभूमी बनविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न कऊया, असे डॉ. संवात यांनी सांगितले.
गोव्याचा लौकिक जगभरात पोहोचेल : ब्रह्मेशानंद स्वामी
या पुरस्काराच्या माध्यमातून आज मातृभूमीने हरिद्वारच्या देवभूमीचा थेट संबंध गोव्याच्या तपोभूमीशी जोडलेला आहे, असे प्रतिपादन स्वामी ब्रह्मेशानंद महाराज यांनी केले. हरिद्वारची देवभूमी आणि गोव्याची तपोभूमी यांचा समन्वय झालेला आहे. ही केवळ सुऊवात असून भविष्यात गोव्याच्या किनारी भागात ज्या थिल्लर पार्ट्या, अमली पदार्थांसारखे अन्य गैरव्यवहार चालतात त्यांना कायमचा चाप बसेल आणि योगाच्या माध्यमातून हा समुद्रनारायण गोव्याचा लौकिक जगभरात पोहोचवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जेथे ’राम’ देव आणि बाळ ’कृष्ण’ आहे तेथे भारत आहे, आणि अशा भारतात या दोन्ही रामकृष्णांनी मिळून हजारो ’विवेकानंद’ निर्माण केलेले आहेत. हे विवेकानंद सध्या विश्वाला गवसणी घालत आहेत. अशा प्रकारे विवेकानंद निर्माण करणाऱ्या बाळकृष्ण यांचा मातृभूमी पुरस्काराने गौरव होत आहे याबद्दल मातृभूमी खरोखरच कौतुकास पात्र आहे, असे प्रशंसोद्गारही स्वामी ब्रह्मेशानंद यांनी काढले.
मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलन आणि व्यासपीठावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुऊवात झाली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्याहस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गोविंद भगत आणि ऊपा धारवाडकर च्यारी यांनी सुत्रसंचालन केले.
गोव्याच्या सांस्कृतिक पंरपरेचे दर्शन!
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., संस्थेतर्फे राजधानी पणजीतील औझाद मैदानावर आयोजित केलेल्या ‘लोकमान्य मातृभूमी पुरस्कार 2023’ सोहळ्यात आज गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. या सोहळ्याला ग्रामीण भागातील लोकांनीही लक्षणीय उपस्थिती दर्शवल्याने का कार्यक्रम दिमाखात पार पडला.
योगगुरू रामदेवबाबा हे आजच्या सोहळ्याचे खास आकर्षण होते. त्यांच्या स्वागतासाठी म्हार्दोळ येथील घोडमोडणी व रोमटामेळ पथकाने एकच ठेका धरल्याने आझाद मैदान परिसर सांस्कृतिक परंपरेच्या दर्शनाने दणाणून गेला. यावेळी रामदेवबाबा, आचार्य बाळकृष्ण व कुंडई तपोभूमी पीठाधीश ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांना वाजत-गाजत कार्यक्रमाच्या प्रवेशाद्वाराच्या ठिकाणी वाजत गाजत आणण्यात आले. यावेळी सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने रामदेवबाबा व स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांच्यावर पुष्पवर्षावर तसेच ओवाळणी करून स्वागत केले.
आझाद मैदानात पोहोचताच रामदेवबाबा यांनी हुतात्म्यांचे स्मरण म्हणून स्मारकाला पुष्पहार व फुले वाहून त्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. संस्थेचे संस्थापक तसेच तऊण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांची गळाभेट घेऊन रामदेवबाबांनी आपले नाते अधिकच वृद्धिंगत केले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, अॅड. ब्राह्मीदेवी विविध खात्याचे अधिकारी, माजी मंत्री-आमदार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गोवा संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शंखनादातून मांगल्याची निर्मिती
कोणत्याही शुभकार्यासाठी शंखनाद करणे हा पारंपरिक संस्कृतीचा भाग आहे. लोकमान्य मातृभूमी पुरस्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मये येथील राजेंद्र पांचाळ यांनी उपस्थित राहून शंखनाद केला. लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याबरोबरच कार्यक्रमात मांगल्यप्राप्ती व्हावी, यासाठी हा शंखनाद करण्यात आल्याचे पांचाळ यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमात समई प्रज्वलित करतानाही धार्मिक मंत्रोउच्चाराने परंपरेचे दर्शन घडविण्यात आले.
आयुर्वेद स्टॉल ठरला आकर्षण
संपूर्ण जगाला आज योग व आयुर्वेद याचे महत्त्व पटल्यानेच आज कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच लोक कल्प फाऊंडेशनतर्फे स्टॉल उभारण्यात आला होता. उपस्थित लोकांसाठी हा स्टॉल आकर्षणाचा भाग ठरला. विविध आयुर्वेद गोष्टींची माहिती व साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी या स्टॉलला भेट दिली.
अनेकांकडून लोकमान्यची सदस्य नोंदणी
देशात 200 हून अधिक शाखा असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., संस्थेतर्फे आज नूतन सदस्य नोंदणी करण्यात आली. संस्थेची पारदर्शकता व विश्वासार्हता यामुळे या संस्थेत सदस्य होण्यासाठी आजही अनेकजणांनी नोंदणी केली.
गोवा संगीत महाविद्यालयाचे सुंदर सादरीकरण
योगगुरू रामदेवबाबा, स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य, आचार्य बाळकृष्ण व इतर लोकप्रतिनिधींचे आझाद मैदानाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर गोवा संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सूर, ताल व उत्तम आवाजाच्या माध्यमातून पारंपरिक गायन सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. या सादरीकरणावेळी विद्यार्थीनीने केलेले बासरीवादनामुळे परिसर मंत्रमुग्ध झाला. संगीत महाविद्यालयाच्या सुंदर सादरीकरणाची सर्वांनी प्रशंसा केली.
छत्रपतींचा एक तरी गुण आत्मसात करा : ठाकुर
आपल्या स्वागतपर भाषणात किरण ठाकुर यांनी, शांतताप्रिय गोव्यात धर्माच्या नावाखाली भेदभाव होत नाही. अशी ही सुवर्णभूमी आरोग्यभूमी आणि योगभूमी व्हावी असा प्रयत्न पुढील काळात होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आम्ही आत्मसात करू शकलो तरी आमचे जीवन सफल झाल्याचे समाधान लाभेल, असेही ते म्हणाले.