वैराग / प्रतिनिधी
कोरोना संसर्गाची झळ सर्वांनाच बसली आहे. यामध्ये ग्रामीण भागात ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी आरोग्यकर आदी प्रकारची बाकी थकली आहे. बार्शी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैराग ग्रामपंचायतीला याचा फटका बसला आहे. विविध व्यवसाय व्यापारी गाळे धारकांकडे ९० लाख रुपये थकले असून ४ हजार ८०० कुटुंबाकडे सुमारे साडेतीन कोटीची थकबाकी आहे. यामध्ये पाणीपट्टीचे ३ हजार ६०० नळधारक असून घरभाडे संख्या मोठी आहे.ग्रामपंचायत मुदत संपल्याने व्यापारी गाळेधारकांनी सुमारे ११ लाख रूपयांची थकबाकी रक्कम जमा केली असल्याचे प्रशासक तथा ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एच.ए.गायकवाड यांनी सांगितले. वैराग येथे सहा वार्ड असून१७ सदस्य संख्या आहेत. गाव व विस्तारीत भागासह सुमारे १४ हजार ५०० मतदार संख्या आहे. वैराग ग्रामपंचायत निवडणूकीची प्रशासकीय प्रकिया सुरू झाली आहे. वार्ड रचना, मतदार याद्या अद्यायावत करणे आदी कामे सुरु असल्याचे सांगितले. यावेळी कार्यालय अधिक्षक विलास मस्के, पाणी पुरवठा अभियंता रामभाऊ जाधव व कर्मचारी उपस्थितीत होते.