प्रतिनिधी / वैराग
वैराग येथील जय संघर्ष संस्था यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन ई – मेल द्वारे केली आहे . जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांनी निवेदना मार्फत सर्वच वाहनचालकांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अशी माहिती जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
की कोरोना मुळे लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनचालकास रोजचा दैनंदिन खर्च, शिक्षण खर्च व इतर खर्च कर्जाचे हप्ते भरणे, जड झाल्या त्यामुळे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने आर्थिक सहाय्य देण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे. वैराग येथील संतोष ताकभाते फिरोज मुलानी मुबारक शेख सतीश पांढरमीसे दादाराव भीसे आदी मान्यवर यांच्या वतीनेही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.