आरक्षणाऐवजी वॉर्ड पुनर्रचनेबाबत तक्रारी वाढल्या ः किचकट वॉर्ड पुनर्रचना समजण्यासाठी नागरिकांना बराच अवधी लागण्याची शक्मयता
प्रतिनिधी / बेळगाव
वॉर्ड पुनर्रचनेकरिता शासनाने दिलेली मार्गसूची धाब्यावर बसवून वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घरपट्टी भरताना किंवा अन्य सरकारी कामकाजासाठी वॉर्ड क्रमांकाची माहिती असणे आवश्यक आहे. पण किचकट वॉर्ड पुनर्रचना समजण्यासाठी नागरिकांना बराच अवधी लागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी आक्षेप नोंदविणे गरजेचे आहे.
महापालिकेच्यावतीने वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना अधिक बसण्याची शक्मयता असून याबाबत नागरिकांना माहिती करून घेणे गरजेचे आहे. वॉर्ड पुनर्रचना निवडणुकीकरिता असली तरी शहरातील नागरिकांना विविध कामकाजाकरिता वॉर्ड क्रमांक माहिती असणे आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर विविध माहिती देताना वॉर्ड क्रमांकाची माहिती विचारण्यात येते. त्यामुळे नागरिकांना आपला वॉर्ड क्रमांक माहीत असणे गरजेचे आहे. पण महापालिकेने 2018 मध्ये तयार केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेवर शिक्कामोर्तब करून नगरविकास खात्याने आरक्षण जाहीर केले आहे. महानगरपालिकेने 2018 मध्ये केलेली वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याचा दावा करून तक्रारी केल्या होत्या. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही वॉर्ड पुनर्रचनेत कोणताच बदल न करता ‘जैसे थे’ ठेवत केवळ आरक्षण जाहीर केले आहे. 2018 मध्ये वॉर्ड पुनर्रचना करताना तात्कालिक वॉर्ड पुनर्रचना प्रसिद्ध करून हरकती मागविणे बंधनकारक होते. पण महापालिका प्रशासनाने शहरवासियांना अंधारात ठेवून हरकती न मागविताच वॉर्ड पुनर्रचना केली होती. त्यामुळे आरक्षणाऐवजी वॉर्ड पुनर्रचनेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सध्या वॉर्डनिहाय आरक्षण नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. हरकती नोंदविण्याची सूचना केली असून पंधरा दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र, आरक्षणासाठी हरकती दाखल होण्यापेक्षा वॉर्ड पुनर्रचनेवरच अधिक चर्चा सुरू आहे. वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याबाबतच्या तक्रारी करण्याकरिता केवळ इच्छुक उमेदवार धावपळ करताना दिसत आहेत. वास्तविक पाहता शहराच्या मध्यभागातून करण्यात आलेली वॉर्ड पुनर्रचना सर्वसामान्य नागरिकांना डोकेदुखी ठरण्याची शक्मयता आहे. कारण प्रत्येक सरकारी कार्यालयात कोणत्याही कामासाठी वॉर्ड क्रमांक विचारला जातो. वॉर्ड क्रमांक माहीत नसल्यास नागरिकांची कामे उशिरा होतात. काही कार्यालयांमध्ये कामे होत नाहीत. अशावेळी नागरिकांची गैरसोय होते.
वॉर्ड क्रमांक लक्षात ठेवणे कठीण यापूर्वीचे वॉर्ड क्रमांक दक्षिणेकडून सुरुवात होऊन उत्तरेकडे शेवटचा वॉर्ड येत होता. पण वॉर्ड पुनर्रचना करताना गोलाकार पद्धतीने करून शहराच्या मध्यवर्ती भागातून वॉर्ड क्रमांक एकची सुरुवात होते. वॉर्डना गोलाकार पद्धतीनेच क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे कुठे कोणता वॉर्ड येतो, हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात सहजासहजी येत नाही. पासपोर्ट काढण्यासाठी किंवा आधारकार्ड काढण्याकरिता तसेच जन्म-मृत्यू दाखला, जात-उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला अशा प्रत्येक कामाकरिता वॉर्ड क्रमांक माहीत असणे बंधनकारक आहे. घरपट्टी भरतानादेखील वॉर्ड क्रमांक माहीत नसल्यास अडचणी येतात. त्यामुळे प्रत्येकजण वॉर्ड क्रमांकाची नेंद ठेवतात.