वृत्तसंस्था/मुंबई :
देशभरात कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा कालावधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांची कोणत्याही प्ररकारची गैरसोय होऊ नये म्हणून वोल्वो कार इंडियाने वॉरंटी कालावधी 31 मे 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचा वॉरंटी कालावधी 22 मार्च 2020 पासून 3 मे 2020 पर्यंत होता त्यांना याचा लाभ होणार आहे. यासोबत अन्य सुविधा कंपनीकडून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येते.
कोविड 19 संबंधीत धोका कमी करण्यासाठी एकंदर आरोग्य आणि अन्य सामाजिक सुरक्षा लक्षात घेता वोल्वो कार इंडियाने हा निर्णय घेतला आहे. मागील महिन्यात, कंपनीने कर्मचाऱयांना महामारीच्या संकटात सुरक्षित ठेवण्यासाठी वर्क फ्रॉर्म होमची परवानगी दिली. आमच्यासाठी कर्मचारी आणि ग्राहकांची सुरक्षा अतिशय महत्वाची असल्याने कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी आम्ही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत असल्याचे वोल्वो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्ल्स फ्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.