प्रतिनिधी/ सातारा
राज्यासह जिह्यात कोरोनाची प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या हलचालीना वेग आला आहे. यामुळे व्यवसायिक पुन्हा चिंतेत दिसत आहे. लॉकडान लागु झाल्यास आर्थिक तोटय़ाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे कारवाई कडक करण्यात यावी अशी मागणी व्यवसायिकांकडून होत आहे.
मार्च महिन्यात लागू झालेल्या लॉकडाऊन जून महिन्यापर्यंत होता. यामुळे खरेदी-विक्रीचे सर्वच व्यवहार बंद होते. ऐन लग्नसराईच्या हंगामात लॉकडाऊन ने व्यवसायिकांचे कंबरडे मोडले होते. हा तोटा भरून काढण्यासाठी वस्तूच्या किंमतीही वाढवण्यात आल्या आहेत. तोच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नियम मोडीत निघाले आहेत. यामुळे दुकानात, बाजारपेठेत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनच्या हलचाली सूरू झाल्या आहेत. यामुळे व्यवसायिकांच्यात धास्ती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन झाले तर आर्थिक संकट वाढणार आहे. सरकारकडून कोणतीच मदत जाहीर करण्यात येत नसल्याने या लॉकडाऊनला विरोध करण्याचा प्रयत्न व्यापारी, व्यवसायिक करणार का ? याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.