अनेक वर्षांपूर्वी एका गावात दुष्काळ पडला होता. लोकांना, जनावरांना प्यायला पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गावातील काही लोकांनी दुसऱया गावांत स्थलांतर करण्याचे ठरवले. गावातील काही जुन्या आणि जाणकार लोकांचा या स्थलांतराला विरोध होता.
त्यामुळे गावातील एका वटवृक्षाखाली गावातील तरुण आणि वृद्ध लोकांची बैठक घेण्याचे ठरले. संपूर्ण गावांत दवंडी पेटवली गेली. गावात सगळीकडे या बैठकीची चर्चा सुरू झाली. लोकांमधील उत्सुकता वाढीस लागली.
ज्या दिवशी बैठक होणार होती त्याच्या आदल्या दिवशी गावातील एक अतिशय वयोवृद्ध आजी गावातील प्रमुख व्यक्तींना भेटली. तिने त्या प्रमुखांना आपल्या गावांतील मातीत सोने असल्याचे सांगितले. हे सोने आपल्या गावातील तरुणांना मिळू शकेल असेही सांगितले.
सुरुवातीला गावातील प्रमुखांना ती वृद्ध आजी जे सांगते आहे त्याबाबत खूप हसू आले. कारण ज्या गावात अनेक वर्षांपासून दुष्काळ पडला आहे तेथील मातीत सोने कसे असू शकते? ही हास्यास्पद गोष्ट त्या गाव प्रमुखांना वाटली. गाव प्रमुखांनी त्या आजीला दुसऱया दिवशी बैठकीला येण्यास सांगितले.
गावांत दुसऱया दिवशी बैठकीला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणेच गावांतील तरुणांनी स्थलांतर करण्याचे सांगितले. वयोवृद्ध लोकांनी त्यास विरोध केला. बराच वेळ वाद-विवाद सुरू होता. गावांतील प्रमुखांनी वाद-विवाद सुरू असतांना त्या वयोवृद्ध आजींना तेथे
बोलवले.
त्या प्रमुखांनी आजीने सांगितलेली गोष्ट तेथील गावकऱयांना सांगितली. ते गावकरी सुद्धा खूप हसलेत. काही तरुणांनी आजीला गावातील मातीत सोने कसे आहे? हे विचारले. त्यावर आजीने विचारले की, ‘आपल्या गावातील माती कोणत्या रंगाची आहे?’ ते तरुण म्हणालेत की, ‘आपल्या गावांतील माती काळय़ा रंगाची आहे.’ आजीने पुन्हा विचारले की,‘ माती किती वर्षांपासून काळय़ा रंगाची आहे?’ पुन्हा ते तरुण उत्तरलेत की, ‘माती अनेक वर्षांपासून काळय़ा रंगाची आहे.’ आजीने पुढला प्रश्न विचारला की, ‘दुष्काळ किती वर्षांपासून पडला आहे आपल्या गावात?’ ते गावकरी म्हणालेत की, ‘अनेक वर्षांपासून गावात दुष्काळ पडला आहे.’ आजीने पुन्हा विचारले की, ‘दुष्काळामुळे गावांतील मातीचा दर्जा कमी झाला का आणि मातीचा रंग बदलला का?’ त्यावर ते तरुण म्हणालेत की, ‘गावांतील मातीचा रंगही बदलला नाही आणि मातीचा दर्जाही कमी झाला नाही.’
बराचवेळ हे प्रश्न-उत्तर सुरूच होते. आजीला नेमके काय सांगायचे आहे हे त्या तरुणांना कळलेच नाही. त्या तरुणांनी आजीला विचारले की, ‘ या आपल्या गावांतील काळय़ा मातीचे करायचे काय?’ त्यावर आजी म्हणाली की, ‘आपल्या गावातील काळी माती तुम्ही तरुणांनी जिथे काहीही उगवत नाही अशा प्रदेशात नेऊन विकली तर या मातीला किंमत प्राप्त होईल. तुम्ही तरुणांनी आपल्या गावातून स्थलांतर करण्यापेक्षा जर गावातील जे टाकाऊ आहे त्यातून काही टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या गावावर असलेल्या सर्वच संकटांचा नाश होईल.’
त्या तरुणांना ही गोष्ट पटली आणि त्यांनी गावातील काळी माती विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या तरुणांना ही काळी माती विकण्याकरिता थोडा त्रास झाला. पण, नंतर मात्र त्या काळय़ा मातीचा दर्जा आणि गुणवत्तेमुळे वेगवेगळय़ा प्रदेशातून काळय़ा मातीला मागणी येऊ लागली. त्या मातीपासून उत्कृष्ट आणि उत्तम प्रकारची भांडी बनवण्यात येऊ लागली. काही कालावधीनंतर काळय़ा मातीच्या विक्रीमुळे त्या गावातील सगळेच लोकं श्रीमंत आणि ऐश्वर्यसंपन्न झालेत.
पुढीलवषी त्या गावात ठरल्याप्रमाणे बैठक त्याच वटवृक्षाच्याखाली घेण्यात आली. गावांतील सगळेच लोकं तेथे उपस्थित होते. गावातील प्रमुखांनी त्या आजीला बोलवले. त्या आजींनी सांगितलेली गोष्ट गावकऱयांनी मनावर घेतली आणि त्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्या आजींचे सगळय़ांनी आभार मानलेत. त्यावेळी त्या आजी म्हणाल्यात की, ‘मागील वषी तुम्ही सगळेच चिंतीत दिसत होतात. तुमची दयनीय स्थिती झाली होती. पण, आपल्या गावातल्या मातीने तुमचे जीवनच बदलून टाकले आहे. आज तुमच्या प्रत्येकाकडे खूप सोने आहे. ते सोने आपल्या काळय़ा मातीतलेच आहे.’
व्यवस्थापनशास्त्रातसुद्धा अनेकवेळा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. बऱयाचवेळा अनेक उपक्रम, योजना, नियोजन उपयोगी पडत नाही. पर्यायाने संबंधित औद्योगिक समूहाचे किंवा उद्योग संस्थेचे खूप नुकसान होते. त्यामुळे कामगार, कर्मचारी, पर्यवेक्षक, व्यवस्थापक आणि संचालक मंडळ यांच्यात एकप्रकारचे नैराश्य निर्माण होते. अशा कठीण प्रसंगी बऱयाच अप्रकाशित योजना, उपक्रम आणि नियोजन तसेच काही निरुपयोगी योजना जर योग्य पद्धतीने राबवण्यात आल्यात तर मात्र औद्योगिक संस्थेचा विकास होण्यास मदत होऊ शकते. तसेच संबंधित उद्योग संस्था प्रगतीपथावर जाऊ शकते. याकरिता योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा प्रत्येक उद्योग संस्थेत किंवा औद्योगिक समूहात आवश्यक असते.
श्रीसमर्थांनी श्रीमददासबोध ग्रंथात याविषयी असे म्हटले आहे की,
“कष्टेवीण फळ नाही। कष्टेवीण राज्य नाही।
केल्याविण होत नाही । साध्य जनीं।।
येहलोकं अथवा परलोक । दोहींकडे सारखाची विवेक । दीर्घसूचनेचें कौतुक।
कळले पाहिजे।।18/07/02-06’’
याचा अर्थ असा आहे की, कष्टाशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय राज्य नाही. कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही. इहलोक किंवा परलोक विवेक दोन्हीकडे सारखाच आहे. त्यात जी दीर्घसूचना आहे ती कळली पाहिजे.
श्रीसमर्थांनी व्यवस्थापनशास्त्रात दीर्घसूचना किती आवश्यक आहे हे त्यावेळी सांगितले होते. पुढील काळ कसा येईल हे कोणासही ठाऊक नसते. म्हणूनच व्यवस्थापनशास्त्रात भाविष्यातील धोके आणि संधी लक्षात घेऊन जे कार्य करतात तेच दीर्घकाळापर्यंत टिकतात.
प्रत्येक औद्योगिक संस्थेच्या आणि उद्योगसमूहाच्या संचालक मंडळाने आवर्जून श्रीसमर्थांच्या श्रीमद्दासबोध ग्रंथातील व्यवस्थापकीय सूत्रांचा अभ्यास करून उद्योग समूहांची भरभराट करावी.
– माधव किल्लेदार