बेळगाव परिसरात आता दरवषी अनेक साहित्य संमेलने होत आहेत. तसेच बेळगाव शहरात सार्वजनिक वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय, लोकमान्य ग्रंथालय या सारख्या संस्था दरवषी अनेक साहित्यिक उपक्रम सादर करीत असल्याने मराठी भाषेची सेवा करण्याचे कार्य या संस्थांकडून अव्याहतपणे केले जात आहे. आपल्या देशात दीडशे वर्षाहून अधिक सातत्याने कार्यरत असलेली जी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी वाचनालये आहेत, त्यामध्ये बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयाचा वरचा क्रमांक आहे.
सार्वजनिक वाचनालय, बेळगाव ही संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अन्वये 1952 साली नोंदणीकृत झाली. या संस्थेची बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वतःच्या मालकीची ऐतिहासिक अशी प्रशस्त इमारत आहे. त्यामुळे ही संस्था बेळगाव व इतर परिसरातील लोकांचे एक आकर्षण बनली असून ती सीमाभागातील मराठी जनतेचा मानबिंदू म्हणून ओळखली जाते. ही संस्था सीमाभागात प्रतिकूल परिस्थितीत गेली 172 वर्षे अव्याहतपणे वाचकांना मौलिक ग्रंथालयीन सेवा देत असून ती प्रामुख्याने मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन करण्याचे कार्य सातत्यपूर्वक करीत आहे.
संस्थेची स्थापना 1848 साली बेळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी जे. डी. इनव्हिरॅरिटी यांनी केली. त्या वेळी वाचनालयाचे नाव ‘दि बेळगाव नेटिव्ह जनरल लायब्ररी, बेळगाव’ असे इंग्रजी होते व 1907 साली या संस्थेचे नाव ‘दि जनरल लायब्ररी, बेळगाव’ असे होते तर 1921 साली या संस्थेचे ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव’ असे मराठीत नामांतर करुन त्याच नावाने आज संबोधले जात आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दरवषी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमध्ये 18 जानेवारी ते 22 पर्यंत बॅ. नाथ पै व्याख्यानमाला 24 एप्रिल रोजी ग्रंथालय दिन, 11 जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी, 26 जून रोजी राजर्षि शाहू महाराज जयंती व दहावीच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव, 3 ऑगस्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती, 13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे जयंती व आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार वितरण, श्रावण मासात संगीत भजन स्पर्धा, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व ज्ञानसत्र व्याख्यानमाला, 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन इत्यादींचा समावेश आहे.
ळगाव शहराच्या सांस्कृतिक जीवनात बॅ. नाथ पै व्याख्यानमालेला विशेष महत्व आहे. ही व्याख्यानमाला म्हणजे एक सांस्कृतिक सोहळाच असतो. ज्ये÷ समाजवादी विचारवंत, प्रभावी वक्ते, संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही व्याख्यानमाला संस्थेचे 1976 पासून म्हणजे गेल्या 44 वर्षांपासून अखंडपणे सुरु केली आहे. यंदाचे हे 45 वे वर्ष होय. बेळगाव, महाराष्ट्र व अन्य राज्यातील थोर विचारवंत, वक्ते, कवी, पत्रकार, कलाकार यांच्या व्याख्यानांचा व कलाकारांच्या अंगभूत कलागुणांचा लाभ या व्याख्यानमालेव्दारे बेळगावातील व परिसरातील नागरिकांना होत आहे.
आतापर्यंत झालेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत दुर्गा भागवत, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, व. पु. काळे, पु. भा. भावे, नानासाहेब गोरे, शांता शेळके, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर, नारायण सुर्वे, जगदीश खेबुडकर, ग. प्र. प्रधान, रणजीत देसाई, बॅ. पी. जी. पाटील, डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रभाकर पाध्ये, यशवंत देव, डॉ. यु. म. पठाण, प्रमोद नवलकर, रा. कृ. कणबरकर, प्रा. लक्ष्मण देशपांडे, रत्नाकर मतकरी, प्रा. शिवाजीराव भोसले, प्रा. रा. रं. बोराडे, सुरेश भट, डॉ. अनिल अवचट, वसंत कानेटकर, यशवंतराव चंद्रचुड, डॉ. जयवंत नारळीकर, नारायण आठवले, विजया मेहता, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, सिंधुताई सपकाळ, हरि नरके, आण्णा हजारे, प्रा. सदानंद मोरे, स्मिता तळवळकर, डॉ. अशोक कामत, आचार्य शांताराम गरुड, डॉ. आ. ह. साळुंखे, ऍड. उज्ज्वल निकम, अरविंद इनामदार, न्या. बी. जी. कोळसे-पाटील, अजीत अभ्यंकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. ना. ज. पवार, ऍड. असिम सरोदे, अच्युत गोडबोले, प्राचार्य मुकुंद दातार, ऍड. रमाकांत खलप, दिनेश ओऊळकर, प्राचार्य डॉ. रमेश आवलगांवकर, डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. विश्वंभर चौधरी, ऍड. देवदत्त परुळेकर, डॉ. राजेश लाटकर, अभिजीत बेल्हेकर, डॉ. कुमार सप्तषी, डॉ. भालचंद्र कांगो, राजीव खांडेकर आदी प्रमुख विचारवंत, कलाकार, पत्रकार, कवी, वक्ते यांनी उपस्थित राहून श्रोतृवर्गाला-रसिकांना मंत्रमुग्ध केले, असे म्हणता येईल.
बॅ. नाथ पै व्याख्यानमाला म्हणजे वसंत व्याख्यानमाला पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला मुंबई, राजषी शाहू महाराज व्याख्यानमाला कोल्हापूर, आण्णासाहेब शिराळकर व्याख्यानमाला सांगली, यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला कराड, स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला पंढरपूर यापैकी एक आहे.