सत्तरी भूमिपुत्र संघटनेचा इशारा : म्हादई अभयारण्याचे संकट दूर करण्याची मागणी
प्रतिनिधी. /वाळपई
गेल्या 21 वर्षांपासून म्हादई अभयारण्य घोषित केल्यामुळे सत्तरीतील 28 गावांवर मोठे संकट निर्माण झाले. हे संकट दूर करण्याची मागणी या भागातील भूमिपुत्र सातत्याने करीत आहेत. मात्र याकडे अद्याप सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच सरकारकडून व्याघ्र प्रकल्प लादण्याचा घाट सुरू आहे. याला सत्तरी भूमिपुत्र संघटना तीव्र विरोध करणार, असा इशारा सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावडे यांनी दिला. वेळूस येथे आयोजित पत्रकार परिषदेत सत्तरी भुमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिचंद्र गावस यांनी विश्वजित राणे यांचे भूमिकेचे समर्थन करून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. स्थानिक आमदार तथा वनमंत्री विश्वजित राणे यांनी व्याघ्र प्रकल्पाला विरोध केलेला आहे. या भूमिकेचेही यावेळी भूमिपुत्र संघटनेकडून समर्थन केले
व्याघ्र प्रकल्पाचा हट्ट कशाला : हरिश्चद्र गावस
हरिश्चंद्र गावस यांनी सांगितले की, अभयारण्याची अधिसूचना 1999 साली जाहीर करण्यात आली. यात सत्तरीतील 28 गावांचा समावेश आहे. लोकवस्ती, देवस्थाने, लागवडी बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याला विरोध करण्यासाठी सत्तरी भुमिपुत्र संघटनेने अनेक वेळा आंदोलन उभारले. एकाबाजूने अभयारण्याची टांगती तलवार जनतेच्या डोक्मयावर आहे, असे असताना व्याघ्रक्षेत्राची गरजच काय? असा सवाल हरिश्चंद्र गावस यांनी केला.
अभयारण्याच्या प्रकल्पामुळे सत्तरी तालुक्मयातील सर्वसामान्य जनता व वनखात्याची यंत्रणा याच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. याला पूर्णविराम मिळायचा असेल तर अभयारण्याची अधिसूचना त्वरित रद्द करावी व व्याघ्रक्षेत्र प्रकल्प करण्याचा खटाटोप पर्यावरणवादींनी सोडून द्यावा, असे आवाहनही यावेळी गावस यांनी दिले.
भूमिपुत्र संघटनेला राजकीय रंग नाही!
भूमिपुत्र संघटना ही सत्तरी तालुक्मयातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारी आहे. काही स्वार्थी लोकांनी या संघटनेचा वापर राजकीय दृष्टय़ा करण्याचा प्रयत्न केला. या संघटनेच्या बाबतीत कोणीही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन गावस यांनी केले. आता विश्वजित राणे यांना वनखात्याची जबाबदारी दिल्यामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या दूर होतील, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरणप्रेमींनी जनतेच्या समस्या समजून घ्याव्या!
व्याघ्र प्रकल्प होण्याच्या दृष्टिकोनातून काही पर्यावरणप्रेमी खटाटोप करीत आहेत. त्यांनी प्रथम सत्तरी तालुक्मयातील ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील जनता संकटात सापडणार आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होणार आहेत. सत्तरी तालुक्मयातील जनतेला अडचणीत आणू नका, असे आवाहन शिवाजी झर्मेकर यांनी केले.
पर्यावरणाचे रक्षणाची जाबाबदारी आमची : बातू गावडे
पर्यावरणाचे आमच्या जीवनात महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे व ती आम्ही समर्थपणे पेलली आहे, असे बातू गावडे यांनी सांगितले.
सत्तरी तालुक्मयातील जनतेला वन खात्याच्या माध्यमातून होणारा त्रास यावेळी सातत्याने विश्वजित राणे यांनी सहकार्य केलेले आहे. ग्रामीण भागातील जनतेची व्यथा त्यांना त्यांना माहिती आहे. यामुळे वनखाते व स्थानिक यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी राणे प्रयत्न करतील, अशी आशा यावेळी बातू गावडे यांनी व्यक्त केली.