-निर्बंध कायम ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय
– व्यापारी दुकाने उघडण्यावर ठाम
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे कोल्हापुरातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असून इतर दुकाने सुरू ठेवल्यास कारवाई अटळ असल्याचीही त्यांनी भूमिका घेतली आहे. व्यापाऱयांनी आज, सोमवारपासून कोणत्याही स्थिती दुकाने सुरूच करणार असा पवित्रा घेतला आहे. यामुळे प्रशासन आणि व्यापारी यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
निर्बंध कायम, केवळ अत्यावश्यकच सेवा सुरू
जिह्यात लागू करण्यात आलेल्या स्तर चारचे निर्बधास पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी जे निर्बंध यापूर्वी होते तेच कायम राहणार आहेत. त्यामुळे आज, सोमवारपासून अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असून इतर दुकाने बंदच राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी दुपारी काढले. नियमांची अंमलबजावणी न करणाऱयांवर गुन्हे दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. सहनशीलतेचा अंत झाल्याने त्यांनी बंड पुकारला असून निर्बंध झुगारून आज, सोमवारपासुन दुकाने सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमीका घेणार याकडे सर्व जिल्हÎाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, रविवारी दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर स्तर चारमध्येच असल्याने पुढील आदेश येईपर्यंत जुन्या नियमाप्रमाणेच अंमलबजावणी होईल, असे स्पष्ट केले. यामुळे अत्यावश्यक सेवा व्यतरिक्त दुकाने सुरू ठेवात येणार नाहीत.
दर आठवडÎाला सुधारित आदेश
जिह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट हा आरटीपीसीआर टेस्ट व त्यामध्ये आलेली पॉझिटीव्ह पेशंटच्या संख्येनुसार ठरविण्यात येतो. जिल्हयातील मागील दोन आठवडयाची कोविड संसर्गित रुग्णांच्या संख्येचा कल विचारात घेवून निर्णय घेण्यात येतो. निर्बंध पातळीवर काही बदल झाल्यास पुढील सोमवारपासून सुधारीत निर्बंध अंमलात येतील, असेही जिल्हा प्रशासनाच्या आदेशामध्ये म्हटले आहे.
नियम भंग करणाऱयावर फौजदारी
आदेशाचे पालन न करणाऱया कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. –जिल्हाधिकारी दौलत देसाई
व्यापाऱयांना समजावून सांगू, कारवाई शेवटचा पर्याय
व्यापाऱयासोबत बैठक घेऊन शासनाच्या नवीन नियमावली समजावून सांगू. आतापर्यंत व्यापाऱयांसह जनतेनेही सहकार्य केले आहे. पुढील आठ दिवस महत्वाचे असून यामध्येही सहकार्य अपेक्षित आहे. त्यातूनही व्यवसाय सुरूच ठेवली. तर कारवाईही हा शेवटचा पर्याय असेल. – शैलश बलकवडे, पोलिस अधीक्षक
सर्व दुकाने आजपासून उघडणार, –चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय
सामाजिक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे अशा कोरोनाच्या नियामांचे पालन करून सर्वच दुकाने आज, सोमवारपास्tान उघडणार असा निर्धार व्यापाऱयांनी केला. रविवारी जिल्हा प्रशासनाने निर्बंध कायम ठेवल्याने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची रविवारी `चेंबर’च्या शिवाजीराव देसाई सभागृहात सभागृहात तातडीची बैठक झाली. यावेळी सर्वांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अध्यक्षस्थानी चेंबरर्सचे अध्यक्ष संजय शेटे होते.
अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या सुरुवातीस कोल्हापुरातील रुग्ण संख्या कमी असूनही व्यापाऱयांनी प्रशासनाला सहकार्य करत सर्व व्यवहार बंद ठेवले. परंतू, व्यापारामुळे कोरोनाचा फैलाव होतो. याला कोणताही शास्त्राrय आधार नसताना प्रशासनाने व्यापाऱयांना वेठीस धरत कठोर निर्बंध लादले. एप्रिल आणि मे हे हंगामी महिने लॉकडाऊनमध्ये गेल्याने व्यापारी मेटाकुटीस आला आहे. व्यापाऱयांचे दुकान भाडे, लाईट बिल, टेलिफोन बील, कर्मचाऱयांचे पगार, कर्जाचे हप्ते व शासनाचे इतर कर दुकान बंद असतानाही वेळेवर भरावे लागतात. ते वेळेवर न भरल्यास व्याज व दंड आकारला जात आहे. दुकाने बंद असून देखील रिटर्न्स भरणे बंधनकारक आहे. ते न भरल्यास दंड व व्याज भरावे लागतात. आर्थिक पॅकेजची मागणी करुनही शासनाने व्यापाऱयासाठी काहीच केले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता आज, सोमवारपासून सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सर्व व्यवसाय सुरु करू, यावेळी शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, आनंद माने, प्रदीपभाई कापडीया, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, संपत पाटील, कुलदीप गायकवाड, अभयकुमार अथणे, भरत ओसवाल, अनिल धडाम, प्रकाश पुणेकर आदी उपस्थित होते.
तर व्यापार बंदच राहिल
मागील आठवडÎात कोल्हापुरचा पॉझिटीव्ह रेट 7.58 टक्के होता. बेडची उपलब्धता 42 टक्के होती. या निकषाप्रमाणे कोल्हापुरातील सर्व व्यापार सुरु करण्यास परवानगी मिळणे आवश्यक होते. राज्य शासनाने निकषामध्ये बदल केले व आरटीपीसीआर पॉझिटीव्ह रेट यासाठी धरावा असा नविन निकष लावला. सरक दरवेळी असे निकष बदलत राहीले तर कोल्हापुरातील व्यापार कधीच सुरु होणार नाही.
एकजुटीने संघर्ष करू
गेल्या 80 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. व्यवसायिकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे आज, सोमवारी दुकाने सुरू करावी लागत आहेत. कारवाईसाठी कोणी आले तर एकजुटीने त्याच्यासोबत संघर्ष करू, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.