प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारीवर्गात असंतोष आह.s गेले वर्षभर अडचणीत असलेले व्यापारी आता कुठे आर्थिक संकटातून बाहेर येत असताना पुन्हा लॉकडाऊनमुळे व्यापारी हादरला आहे. शासनाने अंत पाहू नये, न पेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा रत्नागिरी व्यापारी महासंघाने येथील बाजारपेठेत फलकबाजी करून दिला आहे.
बाजारात अनेक दिवस मंदी आहे. त्यामध्ये पुन्हा लोकडाऊनमुळे व्यापारी संकटात सापडला आह.s कोरोनाबाबतची सर्व खबरदारी व सरकारचे नियम पाळून व्यापार करणार असल्याने न्याय द्यावा इतकीच अपेक्षा, असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. सरकार व्यापारीवर्गाला काही सवलती देईल, असे वाटले होते. पण काहीच पदरात पडलेले नाही. आता पुन्हा ती वेळ सरकारने आणू नये आणि लॉकडाऊन रद्द करावा, अशी रत्नागिरीतील व्यापारीवर्गाची मागणी आहे.