भारतीय वेडिंग मार्केटची उलाढाल 3.71 लाख कोटी रुपयांची
कोरोना महामारीने अन्य देशांप्रमाणेच भारतात देखील मोठ्या संख्येत विवाह सोहळे लांबणीवर पडले होते. विषाणू संक्रमणाने आलिशान विवाह सोहळ्यांना प्रभावित केले आहे. विवाहसोहळे टाळले गेल्याने केटरर, टेंट हाउस, विवाहाचे हॉल, पत्रिकेचे प्रिंटिग, फुल-माळा, बँड-बाजापासून अनेक प्रकारच्या व्यवसायांना फटका बसला आहे. आता विवाहाच्या पद्धती देखील बदलल्या आहेत.
भारतातील विवाहाशी निगडित क्षेत्राची वार्षिक उलाढाल सुमारे 3.71 लाख कोटी रुपयांची आहे. महामारीपूर्वी हा उद्योग दरवर्षी 25 टक्क्यांनी वाढत होता. नव्या स्थितीत आता ऑनलाईन सेवांनी वेग पकडला आहे. प्रमुख ऑनलाइन साइट्सचे उत्पन्न मागील एक वर्षात 20 टक्क्यांनी वाढले आहे.
ऑनलाईन विवाह घडवून आणणारे अनेक वेडिंग प्लॅटफॉर्म सुरू झाले आहेत. वैवाहिक नाते देखील डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने निश्चित होत आहेत. झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईवडिलांच्या उपस्थितीत विवाह ठरू लागले आहेत. मुलगा आणि मुलगी परस्परांची ओळख करून देतात. अनेक साइट्सनी याकरता नवी फिचर्स सादर केली आहेत.
विवाहापूर्वीच सोहळे आता ऑनलाईन होऊ लागले आहेत. नवविवाहित जोडपे लॅपटॉपवर स्क्रीनला स्पर्श करून कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत आहेत. वेडमीगुड नावाचे ऍप मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, केटरर आणि पुजाऱ्यांची व्यवस्था करून देत आहे.
अनेक कुटुंबांनी विवाहसोहळय़ात प्रत्यक्ष सामील होणाऱ्या पाहुण्यांच्या घरी आरोग्य कर्मचारी पाठवून कोरोनाची चाचणीही करवून घेतली आहे. आता अन्य सोहळे देखील ऑनलाईन स्वरुपात आयोजित होत आहेत.