हिंदू जनजागृती समितीचे खानापूर तहसीलदार-विविध महाविद्यालयांना निवेदन
प्रतिनिधी / खानापूर
‘व्हॅलेटांईन डे’ च्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी 14 फेब्रुवारी मातृ-पितृ दिन म्हणून साजरा व्हावा, जिल्हा प्रशासनाने या संबंधी जनजागृती करावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदू जनजागृती समितीने गुरुवारी खानापूर तहसीलदार व शहरातील विविध महाविद्यालयाना दिले आहे.
14 फेब्रुवारीला तरुणाईकडून व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम संदेश साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण असून हिंदू जनजागरण समितीने या विरोधात अनेकदा आवाज उठवला आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी मातृ-पितांचे पूजन करुन त्यांचा आशीर्वाद घ्या, अशी भूमिका या समितीने नेहमी मांडली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तरुणाकडून अनाचार घडत असतात. त्यामुळे हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्याची सूचना करावी. पाश्चात्य वाद्यांनी व्यावसायिक फायद्याच्या प्रेमाच्या नावाखाली या विकृत संकल्पनेमुळे तरुण पिढी भोग आणि अनैतिकतेच्या गर्तेत पडून आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर प्रेमाच्या भयानक सादरीकरणाच्या नावाखाली, एकतर्फी प्रेम करणाऱया मुला-मुलीमध्ये बऱयाच हिंसक घटना घडतात. तरुणांमध्ये गैरवर्तन, मद्यपान पदार्थांचे सेवन इत्यादीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर मोठे पुरावे अनैतिक संबंधात वाढ दर्शवित आहेत. या दिवशी मुलीना त्रास देण्यासाठी अति वेगाने वाहन चालविणे, शिवीगाळ होण्यास कारणीभूत ठरते. जे मुलींना खोटी नावे देऊन दिशाभूल करतात, त्यांना ’लव्ह जिहाद’चा बळी ठरवतात.
थोडक्मयात ’व्हॅलेंटाईन डे’ मुळे, शाळा-महाविद्यालय परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबरोबरच शैक्षणिक वातावरण बिघडवणाऱया स्वार्थी व मोहवृत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजच्या परिस्थितीत भारतात 13 मिनिटाला एक बलात्काराची घटना घडत आहे. स्त्रियांवरील अत्याचाराची भयानक आकडेवारी ही आजच्या समाजातील घटती विचारसरणी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रतीक आहे.
या अनाचारांना आळा घालण्यासाठी काही सामाजिक संस्था गेल्या काही वर्षापासून मातृ-पित्तृ पूजनाच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी एक आदर्श प्रतिशब्द तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या पालकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र आणून त्यांची उपासना आणि एकत्रितपणे त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे हे या उपक्रमाचे स्वरूप आहे. तेव्हा मातृ-पितृ पूजनाला विशेष महत्व देण्यासाठी तरुणाईला परावृत्त करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे
निवेदन देताना संभाजी चव्हाण, गंगाराम घाडी, सदानंद मासेकर, कोनेरी कुम्रतवाडकर, लक्ष्मण चौगुले, राजू चव्हाण आदी उपस्थित होते.