गणपत गल्ली कॉर्नरवरील व्हॉल्वमधून वाहतेय पाणी : दुरुस्तीकडे पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विकासकामे राबविण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोटय़वधीचा निधी खर्ची घालण्यात येत आहे. याअंतर्गत गणपत गल्ली परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. पण खडेबाजारमध्ये गणपत गल्ली कॉर्नर येथील पाण्याच्या व्हॉल्वमधून पाणी वाहत असल्याने रस्ता खराब होण्याची शक्मयता आहे.
रस्त्यांचा विकास आणि पाणीपुरवठय़ाच्या देखभालीकरिता लाखोंचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पाणीपुरवठा करण्यात आलेला
व्हॉल्व खराब झाला असल्याने पाणी पुरवठय़ादरम्यान पाणी वाहत आहे. सदर क्हॉल्वमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. व्हॉल्वमधून सातत्याने पाणी वाहत असल्याने या ठिकाणी खड्डा निर्माण झाला आहे. रस्त्यावर चरही पडली आहे. याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज असून याकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणी वाहण्याचे प्रमाण वाढले असल्याने नव्याने डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता खराब होण्याची शक्मयता आहे. वाहणारे पाणी पादचाऱयांच्या अंगावर उडत आहे. यामुळे याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
नागरिकांमधून नाराजी
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाची पाणी पातळी समाधानकारक असल्याने पाणी गळती निवारणाकडे पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. क्लब रोड, महात्मा फुले रोडसह शहरातील विविध भागात जलवाहिनीला गळती लागली आहे. काही ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांना गळती लागल्याने गळतीद्वारे चोवीस तास पाणी वाहत असते. याबाबत पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता व्हॉल्वमधून पाणी वाया जात असल्याचे पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. काही अधिकाऱयांकडे तक्रार केल्यास साहेब बाहेर गेले आहेत. आल्यानंतर सांगतो, असे सांगण्यात येत आहे. यामुळे गळती निवारणाचे काम वेळेवर केले जात नसल्याने शुद्धीकरण केलेले पाणी वाया जात आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अधिकाऱयांनी प्रयत्न करावे
नागरिकांना पाच ते आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तो मुबलक प्रमाणात केला जात नाही. पाणी कमी असल्याचे सांगण्यात येते. पण गळतीद्वारे वाया जाणारे पाणी वाचवून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही केली नाही. यामुळे शहरातील जलवाहिन्यांची गळती निवारण्याचे काम हाती घेऊन पाणी वाचविण्यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.