खडेबाजार-गणपत गल्ली कॉर्नरवरील व्हॉल्वमधून वाहतेय पाणी : पाणीपुरवठा मंडळाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार येथे दोन ते तीन ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी पाणीगळती सुरू आहे. पाण्याची गळती होऊन रस्ताही खराब होत आहे. जोरात वाहने जाताच ये-जा करणाऱया नागरिकांच्या अंगावर पाणी उडत आहे. तसेच हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे रहिवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्त्याचा विकास आणि पाणी पुरवठय़ाच्या देखभालीकरिता लाखोचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. व्हॉल्व खराब झाल्याने पाणी पुरवठय़ादरम्यान पाणी वाहत आहे. सदर क्हॉल्वमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. व्हॉल्वमधून सातत्याने पाणी वाहत असल्याने याठिकाणी खड्डा निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरदेखील चर पडली आहे. याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज असून याकडे पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणी वाहण्याचे प्रमाण वाढले असल्याने नव्याने डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता खराब होण्याची शक्मयता आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाची पाणीपातळी समाधानकारक असल्याने पाणीगळती निवारणाकडे पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. क्लब रोड, महात्मा फुले रोडसह शहरातील विविध भागात जलवाहिनीला गळती लागली आहे. काही ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांना गळती लागली असल्याने गळतीद्वारे पाणी वाहत असते. यामुळे याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता, व्हॉल्वमधून पाणी वाया जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत. यामुळे गळती निवारणाचे काम वेळेवर केले जात नसल्याने शुद्ध करण्यात आलेले पाणी वाया जात आहे.
नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. पाणी कमी असल्याचे सांगण्यात येते. पण गळतीद्वारे वाया जाणारे पाणी वाचवून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे शहरातील जलवाहिन्यांची गळती निवारणाचे काम हाती घेऊन पाणी वाचविण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.