राज्यात 5,172 नव्या रुग्णांची भर : 98 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच रुग्ण संसर्गमुक्त होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. मागील तीन दिवसांत दररोज 3 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी उच्चांकी 3,860 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 53,648 जण बरे झाले आहेत.
शनिवारी राज्यभरात 5,172 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील चार दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. राज्यात आतापर्यंत 1,29,287 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 98 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींचा एकूण आकडा 2,412 वर गेला आहे. उपचारातील रुग्णसंख्या 73,219 इतकी असून त्यापैकी 602 रुग्ण अतिदक्षता विभागातील आहेत.
मागील 24 तासांत बेंगळूर शहर जिल्हय़ात 1,852, म्हैसूरमध्ये 365, बळ्ळारी 269, गुलबर्गा व बेळगाव जिल्हय़ात प्रत्येकी 219, धारवाड 184, हासन 146, मंगळूर 139, उडुपी 136, बागलकोट 134, विजापूर 129, शिमोगा 119, रायचूर 109, दावणगेरे 108, कोप्पळ 107, तुमकूर, गदगमध्ये प्रत्येकी 99, मंडय़ा 95, बेंगळूर ग्रामीण 93, चिक्कबळ्ळापूर 72, चित्रदुर्ग 60, चिक्कमंगळूर 57, बिदर व हावेरीत प्रत्येकी 52, कारवार व रामनगरमध्ये प्रत्येकी 51, चामराजनगर 43, यादगीर व कोलार प्रत्येकी 39, कोडगू जिल्हय़ात 35 रुग्णांची भर पडली आहे.