प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाला जोर आला असून शनिवारी सकाळी काहीशा दमदार सरी कोसळल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. गणेशोत्सवातच पावसाला सुरुवात झाल्याने गणेश मंडळांना पावसापासून बचाव करण्यासाठी धडपड करावी लागली. याचबरोबर या पावसाचा बाजारपेठेवरही परिणाम झाला. गणेशोत्सव काळात खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडते. ग्रामीण भागातील जनतेने पावसामुळे शहराकडे पाठ फिरविल्यामुळे शनिवारी बाजारपेठेमध्ये म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही.
शुक्रवारी रात्रीपासून पावसाला काहीसा जोर आला होता. शुक्रवारीही अधूनमधून सरी कोसळत होत्या. यामुळे भाजी विपेते, फेरीवाले यांची धावपळ उडाली होती. पावसापासून आडोसा शोधण्यासाठी साऱयांचीच धडपड सुरू होती. पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या जनतेलाही मोठा त्रास झाला. ऐन सणातच सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठेवर आणि भक्तांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली.
शनिवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. अचानकपणे सरी येत होत्या. त्यामुळे फेरीवाले तसेच बैठय़ा व्यापाऱयांना त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. अजूनही पिकांना दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल तीव्र नाराजी
या पावसामुळे काही ठिकाणी दलदल झाली होती. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामे अर्धवट असल्याने त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन घालण्यात येत आहेत. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.