प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले असून, वाहनधारकांना हे खड्डे धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून शनिवार खूट चौकातील खड्डय़ात नागरिकांनी वृक्षारोपण केले. तरीदेखील खड्डा बुजविण्याची जाग महापालिकेच्या अधिकाऱयांना आली नाही. महापालिकेच्या कारभाराबद्दल सध्या नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उन्हाळय़ात निर्माण झालेल्या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाचा कानाडोळा झाला आहे. सातत्याने तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नाही. पावसाळय़ात निर्माण झालेल्या खड्डय़ांमुळे नागरिकांचे जीव धोक्मयात आले आहेत. शनिवार खूट परिसरात जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई केली. डेनेज व इतर वाहिन्यांसाठी चरी मारण्यात आल्या. पण चरी व्यवस्थित बुजवून डांबरीकरण केले नाही. त्यामुळे या चरी वाहनधारकांना धोकादायक बनल्या आहेत. चरीत दुचाकी अडकत असल्याने वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी खड्डय़ामध्ये रोपटे लावले. सदर रोपटे लावून आठ दिवस झाले तरी मनपा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मनपा अधिकाऱयांना कधी जाग येणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.