ऑनलाईन टीम / मुंबई :
शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते सर्वांना सल्ला देतात, त्यांचा सल्ला घेण्यात गैर काय? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, शरद पवरांचा सल्ला घेतला याचा अर्थ ते सरकार चालवतात असा नाही. ते एक वरिष्ठ नेते आहेत. जर आपण त्यांचा सल्ला घेतला नाही, तर आपल्यासारखे आपणच करंटे असे देखील राऊत यांनी यावेळी म्हटले.
- राजभवन ही राजकारणाची जागा नाही
मुळात महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी कुणाला शरद पवारांकडे पाठवण्याऐवजी नरेंद्र मोदींकडे पाठवायला पाहिजे होते असे राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल यांनी राजभवनाबाहेर येऊन राजकारण करावे असा टोला देखील त्यांनी लगावलाय.
आमचे राजकीय हिंदुत्व नाही. राजकारणासाठी आजवर कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपण हिंदुत्त्वाची भूमिका मांडते. घंटा बडवल्या, शेंडी-जानवं ठेवले म्हणजे हिंदुत्व नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मी अजूनही शिवसैनिक असून, शिवसैनिकाला वय नसते असेही यावेळी ते म्हणाले.
कंगना रानौतच्या विषयाला जास्त महत्व देण्याची गरज नाही. ती संशयित आरोपी आहे, तिने पोलिसांसमोर येणे आवश्यक आहे. पण ती का येत नाही माहीत नाही असे राऊत म्हणाले.
- अशोक चव्हाण नाराज नाहीत
नांदेड महापालिकेचा विषय असेल तर तो बोलून सोडवता येईल. अशोक चव्हाण हे नाराज नाहीत असे राऊतांनी स्पष्ट केले.