ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढत चालला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. मुंबई – पुण्यातील स्थिती तर चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सकाळी अकरा वाजता फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.
तसेच पालघर प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्टीकरण दिले. तसेच याचे कोणी राजकारण करू नये असं ही सांगितले आहे. त्यानंतर आज शरद पवार देखील यावर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लॉक डाऊन मुळे अनेक उद्योगधंदे देखील बंद आहेत. तसेच पुढील काळात बेकरी, बेरोजगारी वाढू शकते. आणि हे संकट पाहता आपण आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे असे पवार यांनी आधीच स्पष्ट केले होते. 20 एप्रिल पासून लॉक डाऊन देखील काही भागात शिथिल करण्यात आला आहे, या काळात काय करायचे, यांची अंबलबजावणी कशी करावी याबद्दल ही ते बोलण्याची शक्यता आहे.
या सारखे विवध प्रश्न लोकांच्या मनात असतील. या काळात लोकांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी शरद पवार आज जनतेशी संवाद करणार आहेत.