बायागत 30 लाख 66 हजार, पाण्याचा स्तोत्र असलेली 29 लाख 45 हजार तर माळवट जमिनीचे प्रति एकर दर 16 लाख
गंगाधर पाटील/ बेळगाव
शहरातील जागांच्या दरांमध्ये ज्या प्रमाणे वाढ झाली आहे त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील बागायत जमीन, पाण्याचा स्तोत्र व माळवट जमिनींचे दर देखील गगनाला भिडले आहेत. ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त हलगा गावातील जमिनीला अधिक महत्व आल्याचे मुद्रांक आणि नोंदणी खात्याच्या दर निश्चितीवरुन स्पष्ट झाले आहे. शहराच्या पूर्व व उत्तर भागातील जमिनींच्या दरामध्ये सर्वात जास्त हलगा येथील जमिनींचे दर असून बागायती जमिनीला 30 लाख 66 हजार रुपये एकरी दर निश्चित करण्यात आला आहे तर पाण्याचे स्तोत्र असलेल्या जमिनीला 29 लाख 45 हजार रुपये दर तर माळवट जमिनीला 16 लाख रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
पूर्वभागातील हलगा गावानंतर उत्तर भागातील कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक गावातील जमिनींना महत्व अधिक प्राप्त झाले आहे. कंग्राळी खुर्द येथील बागायत जमीन 24 लाख 22 हजार, पाण्याचे स्तोत्र असलेल्या जमिनीला 18 लाख 46 हजार आणि माळवट जमिनीला 15 लाख रुपये प्रति एकरी आहेत. कंग्राळी बुद्रुक गावातील बागायत जमिनीला 24 लाख 20 हजार, पाण्याचे स्तोत्र असलेल्या जमिनीला 17 लाख 51 हजार, माळवट जमिनीला 15 लाख रुपये प्रतिएकरी त्याखालोखाल काकती गावातील बागायत जमिनीला 24 लाख रुपये, पाण्याचे स्तोत्र असलेल्या जमिनीला 17 लाख 65 हजार आणि माळवट जमिनीला 14 लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित करण्यात आला आहे.
विमानतळ असलेल्या सांबरा परिसरातील जमिनींच्या दरांनीही उच्चांकी गाठत बागायती जमिनीला 19 लाख 50 हजार रुपये, पाण्याचा स्तोत्र असलेली 16 लाख 60 हजार रुपये तर माळवट जमिनीला 9 लाख 75 हजार रुपये प्रतिएकर दर आहेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या होनगा गावातील जमिनींचे दर वधारले आहेत. येथील बागायत जमिनीला 18 लाख 75 हजार प्रति एकर जमिनीचा दर तर पाण्याचा स्तोत्र असलेल्या जमिनीला 15 लाख, 25 हजार आणि माळवट जमिनीला 11 लाख 20 हजार रुपये प्रति एकर दर आहेत.
निलजी येथील जमिनींचे दरही वधारले आहेत. निलजी येथील बागायत जमीन 19 लाख 72 हजार, पाण्याचे स्तोत्र जमीन 13 लाख 42 हजार आणि माळवट जमिनीला 8 लाख 20 हजार रुपये प्रति एकर असून त्या पाठोपाठ मुतगा गावातील बागायत जमिनीला 18 लाख 52 हजार रुपये तर पाण्याचा स्तोत्र असलेल्या जमिनीला 12 लाख 72 हजार तर माळवट जमिनीला 9 लाख 40 हजार रुपये प्रतिएकर दर मुद्रांक व नोंदणी खात्याने निश्चित केला आहे. त्यानंतर शिंदोळी येथील बागायत जमिनीचा 17 लाख 52 हजार, पाण्याचा स्तोत्र असलेल्या जमिनीला 13 लाख 42 हजार रुपये तर माळवट जमिनीला 8 लाख 20 हजार रुपये प्रतिएकर दर निश्चित करण्यात आला आहे.
सुवर्णसौधमुळे हलगा परिसरातील जमिनीला अधिक महत्व आले. या भागातील जमिनींचा दर वाढविण्यात आले असून जमिनीला मागणीही वाढली आहे. बागायत जमिनीचे दरांमध्ये वाढ करण्यात आली असली तरी राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जमिनींचे दर देखील गगनाला भिडले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हे दर वाढतच चालले असून जमिनी मिळणे देखील अवघड होत आहे. शहराला लागून असलेल्या कंग्राळी खुर्द आणि कंग्राळी बुद्रुक या गावच्या जमिनींचे दर चढेच आहेत. ही दोन्ही गावे शहराला जोडली गेली आहेत. त्यामुळे साहजिकच जमिनींचे दर वाढले आहेत. यमनापूराचा काही भाग शहरामध्ये समाविष्ट केल्यामुळे तेथील दरही भडकले आहेत.
मुद्रांक आणि नेंदणी खात्याने जमिनीचे एकरी दर निश्चित केले तरी त्या दरामध्ये जमिनी मिळणे अशक्मयच आहे. त्यापेक्षा किती तरी अधिक दराने जमिनी खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. सांबरा परिसरातील बाळेकुंद्री खुर्द येथील जमिनीचे दरही वाढले असून बागायत जमिनीला 17 लाख, पाण्याचा स्तोत्र असलेले 9 लाख 75 हजार तर माळवट जमिनीला 8 लाख 6 हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. उत्तर भागातील मोठे गाव तसेच सुपीक जमिनीचे गाव म्हणून ओळखलेल्या कडोली गावातील जमिनीचेही महत्व वाढले आहे. कडोली गावातील बागायत जमिन 9 लाख 20 हजार रुपये, पाण्याचे स्तोत्र असलेल्या जमिनीला 7 लाख 10 हजार रुपये तर माळवट जमिनीला 5 लाख 70 हजार रुपये प्रतिएकर दर निश्चित करण्यात आले आहेत. याचबरोबर इतर गावांतील जमिनीचे दर देखील वाढले आहेत.