प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक शासकीय कार्यालये आहेत. या शासकीय कार्यालयामुळे वाहतूकीची कोंडी होत आहे. वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी शहरातील शासकीय कार्यालयांचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याची मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली. जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूकीच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ.दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली.
फुटपाथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण,पार्किंगची असुविधा यामुळे शहराची वाहतूकीची कोंडी होत आहे.या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.यावेळी बिंदू, चौक,दसरा पार्किंगच्या विषयावर चर्चा झाली.अशोक पोवार,रमेश म्हणाले, अंबाबाई मंदिरात नेहमी गर्दी होत आहे.पण वाहतूकीला शिस्त नाही. या परिसरातील विद्यापीठ हायस्कूल समोरील होमगार्ड,जिल्हा बाष्पके,रजिस्टर ऑफीस,नेहरु युवा केंद्र, राजवाडा पोलीस ठाण्यासह येथील वनविभाग,जिल्हा हिवताप कार्यालय,पागा बिल्डिंग मधील विद्युत निरीक्षक,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सार्वजनिक बांधकाम विभाग,शाखा अभियंता,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,सार्वजनिक ग्रंथालय,पन्हाळा पाटबंधारे कार्यालय,बकरे यांचे कॅटरर्स गोडावून आहे.या कार्यालयामुळे मोठी रहदारी होते.येथील कर्मचाऱयांच्या वाहनांचा पार्किंगचा प्रश्न आहे.यामुळे या कार्यालयांचे स्थलांतर झाल्यास हा परिसर मोकळा होणार आहे. काही कार्यालयासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,कसबा बावडा येथे जागा असून त्याठिकाणी त्वरित स्थलांतर करावे अशी मागणी केली. पागा बिल्डिंगमधील बांधकाम विभागाचे कार्यालय त्यांच्या ताराबाई पार्कातील मुख्य इमारतीत हलवण्याची सूचना केली.
सीपीआर चौक ते भवानी मंडप या भाऊसिंगजी रोडवर मुख्यतः रहदारी असते.या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात वाहने पार्क केली जात असल्याने रोजच वाहतूकीची कोंडी होत आहे.यामुळे येथील करवीर तहसीलदार,गाव चावडी करवीर,पोलीस स्टेशन,सिटी सर्व्हे,ऍन्टीकरप्शन ही कार्यालये कसबा बावडा मुख्य प्रशासकीय इमारतीत स्थलांतर करण्याची मागणी केली.लक्ष्मीपुरी धान्य बाजार विक्रमनगरात स्थलांतर करण्यात आला आहे.पण त्याची अंमलबजावणी झाली नाही.विक्रमनगर मार्केटमध्ये कायमस्वरुपी हा धान्य बाजार गेला पाहिजे.
बिंदू चौकातील पार्किंग कारागृहाच्या दृष्टिने अयोग्य आहे.काही दिवसापूर्वीच एका माजी सैनिकाने या पार्किंगबाबत आक्षेप घेऊन तक्रार केली आहे.यामुळे हे पार्किंग स्थलांतर करण्याची मागणी केली.दसरा चौक पार्किंगसाठी पैसे आकारल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल अशी सूचना गणी आजरेकर यांनी केली.जिल्हाधिकारी डॉ.दौलत देसाई यांनी करवीर तहसीलमध्ये कॉम्पलेक्स करण्यासाठी जागेची पाहणी करण्याची सूचना केली.पंधरा दिवसांनी याबाबत पुन्हा आढावा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीला अतिरक्ति आयुक्त नितीन देसाई,प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.एस.टी.अल्वारिस,शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत,कृती समितीचे भाऊ घोडके,विनोद डुणुंग,अंजुम देसाई,लालासो गायकवाड,ऍड रणजित गावडे,राजू माळेकर,प्रकाश पाटील,राजू मालेकर,सचिन बिरंजे,रमेश पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
गाडी अडा पार्किंग त्वरित सुरु झाले पाहिजे
कृती समितीने गाडी अडृय़ातील पार्किंगचा मुद्दा उपस्थित केला.गाडी अडृय़ात सुमारे अडीचशे ते तीनशे वाहने पार्क होऊ शकतात.यामुळे शहरातील वाहतूकीचा ताण हलका होऊन रहदारी कमी होणार आहे.पण पार्किंग सुरु का होत नाही अशी विचारणा करत जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अशोक पोवार यांनी केला.या ठिकाणी नियोजन आणि सुविधा उपलब्ध केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पार्किंगचे फलक लावून महापालिकेचा कर्मचाऱयाची नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले.