कोरोना नियमांचा नागरिकांना विसर, सर्वत्र वाहतुकीची कोंडी : गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनाची आवश्यकता
प्रतिनिधी / बेळगाव
‘क्लोजडाऊन ऍण्ड मूव्ह ऑन’ असाच अर्थ नागरिकांनी घेतलेला दिसतो आहे. गर्दी टाळणे हा कोरोनाच्या नियंत्रणासाठीचा महत्त्वाचा नियम असून, तो धाब्यावर बसविण्यातच सध्या नागरिकांनी धन्यता मानली आहे. सकाळी 6 ते 10 पर्यंत बेळगाव शहरात होणारी गर्दी पाहता जितके नागरिक दिवसभर फिरत नाहीत तितके या वेळेत बाहेर पडल्याचे दिसून आले.
शुक्रवारी सकाळी शहराचा फेरफटका मारला असता दिसून आलेली गर्दी ही चिंताजनक आहे. हातात पैसा खेळता राहणे हे निश्चितच गरजेचे आहे. परंतु त्यासाठी आपले आरोग्य पणाला लावणे योग्य नाही. जितकी होईल तितकी विक्री करून घ्यावी या हेतूने हरतऱहेचे विपेते बाजारात दाखल झाले आणि विपेते आहेत म्हणून खरेदीदारही दाखल झाले.
वडगावच्या टोकापासून शाहूनगर पर्यंत सर्वत्र गर्दी दिसून आली. हीच परिस्थिती पहिल्या, दुसऱया व तिसऱया रेल्वे गेटपर्यंत होती. गर्दीला नियंत्रण करणारे कोणीच नव्हते, शिवाय पोलिसांना 10 नंतर कारवाई करण्याचा अधिकार असल्याने गर्दी पाहून काळजी करण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते.
बाजारपेठेत भाजी, प्रामुख्याने कांदे, बटाटे यांची खरेदी अधिक झाली. तर सर्वच ठिकाणी आंबे विपेत्यांची संख्या अधिक होती. वास्तविक हा आंब्याचा मोसम परंतु कोरोनाने त्यावर संक्रांत आणली. परिणामी जितकी होईल तितकी विक्री करून घ्यावी हाच उद्देश प्रत्येकाचाच होता. हीच परीस्थिती द्राक्ष आणि कलिंगड, अंजीर व स्ट्रॉबेरी विपेत्यांची होती.
रानमेव्याची विक्री सुरू होतीच त्याचबरोबर टॉवेल, बेडसिट्स, मास्क, फुले, शोभेची फुले, शोभेची झाडे, मसाल्याचे पदार्थ, इतकेच नव्हे तर खेळणी आणि फुगे यांची विक्री सुद्धा सुरू होती. ज्याला त्याला खरेदी उरकून लवकर परतायचे असल्याने वाहनांची वर्दळ वाढली. परिणामी सर्वत्र वाहतूक कोंडी झाली.
ज्ये÷ नागरिक व मुलांनी बाहेर पडू नये असे प्रशासन सातत्याने सांगत असूनही बाजारपेठेत यांचा वावर अधिक होता. एपीएमसीमध्ये सकाळी 10 नंतर शुकशुकाट होता. परंतु येथे विक्री करण्यासाठी आलेल्या परगावच्या व्यापाऱयांनी, विपेत्यांनी बाहेर विक्री केली. जमखंडीहून आलेल्या विपेत्याने 30 रुपयाला दोन या दराने कलिंगडांची विक्री केली.
मिरचीही तेजीने विक्री
पहाटे 6 वाजताच बाजार भरण्यास सुरूवात होत आहे. त्यामध्ये तिखटासाठीच्या मिरची बाजाराचाही समावेश आहे. 8 ते 9 दरम्यान तेजीने विक्री होते. त्या दरम्यान दरामध्ये घासाघीस केली जात नाही. परंतु 9 नंतर मात्र भाव कमी लावून विक्री केली जाते.