मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राकसकोपमध्ये तीन फूट पाणीसाठा कमी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरवासियांना तीन दिवसाआड आणि काही ठिकाणी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, शहापूरसह अनेक भागात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कडक उन्हाच्या झळांबरोबरच आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हिडकल जलाशयामधून जादा पाणी उपसा करण्याची क्षमता वाढवूनदेखील पाणीटंचाई निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. बाष्पीभवनचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील काही भागात पाण्याचा दुरुपयोग होत आहे. यामुळे राकसकोप जलाशयामधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जलाशयामध्ये आहे. पाऊस लांबल्यास पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली होती. पण आतापासून शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहापूर परिसरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही उपनगरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल जलाशयाच्या विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यात आली आहे. हिडकल जलाशयामधून यंदा सहा एमजीडी जादा पाणी उपसा करण्यात येत आहे. तरीदेखील विविध भागात पाणी टंचाई आहे. सध्या पिण्यासाठी सुरळीत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. पण काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. विद्युत भारनियमन, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे कारण सांगून पाणीपुरवठय़ात कपात केली जात आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली. पण पाणी टंचाईचा फटका नागरिकांना बसत आहे.
सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2459.35 फूट असून मागील वषी 2462.45 फूट होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीन फूट पाणीसाठा कमी आहे. यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. पण हिडकल जलाशयामधील पाणी उपसा वाढविण्यात आला असल्याने पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याचा दावा पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी केला होता. पण एप्रिलच्या मध्यावधीस पाणी टंचाईस प्रारंभ झाला आहे. शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या काही भागात तीन दिवसाआड तर काही भागात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या राकसकोप जलाशयामध्ये दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा आहे. पण जादा पाणी उपसा करण्यात आल्यास मे अखेरपर्यंत पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. पावसाची सुरुवात वेळेवर झाल्यास पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असे सांगण्यात आले.