प्रतिनिधी/ बेळगाव
मार्च महिन्याच्या मध्यापासून शहर व परिसराला उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. मागील रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवू लागला आहे. या वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. रविवारी दुपारच्या सुमारास पारा 34 अंशांवर पोहोचला होता. यामुळे एरवी गर्दीने फुललेल्या रस्त्यांवर रविवारी मात्र तुरळक गर्दी दिसून आली.
गरिबांचे महाबळेश्वर अशी ओळख असणाऱया बेळगावमध्ये सध्या रखरखते ऊन नागरिकांना सहन करावे लागत आहे. वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढल्याने गर्मीत वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना बाहेर पडताना छत्री अथवा टोपी घेऊनच बाहेर पडावे लागत आहे. बाहेर पडल्यानंतरही ज्या ठिकाणी सावली असेल त्या ठिकाणी आधार घ्यावा लागत आहे. पंखा, एसी, फ्रीज यांचाही वापर गर्मीमुळे वाढला आहे.
बाजारातील गर्दी घटली
रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने खरेदी करण्यासाठी नोकरदार बाहेर पडतात. परंतु या रविवारी होळी तसेच वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. यामुळे गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, काकतीवेस, कांदा मार्केट, रविवारपेठ या परिसरात गर्दी कमी प्रमाणात होती. सायंकाळनंतर उष्म्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी होती.
शितपेयांच्या दुकांनावर गर्दी गर्दीने अंगाची लाही लाही होत असल्याने आपोआपच पाऊले शितपेयांच्या दुकानांकडे वळतात. आइस्क्रीम, शितपेय, उसाचा रस, प्रुट ज्यूस, फळे खाण्यासाठी दुकानांसमोर गर्दी होऊ लागली आहे. यात लिंबू सरबतचा खप सर्वाधिक होताना दिसत आहे. कलिंगड, आंबा, अननस, मोसंबी यांचे ज्युस कोपऱया-कोपऱयांवर विक्री करणाऱयांना चांगले दिवस आले आहेत.