धुर फवारणीची होतेय मागणी, समर्थ मंदिर, यादोगोपाळ पेठेत अ रुग्णांची संख्या वाढली
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराच्या पश्चिमेच्या भागात समर्थ मंदिर, यादोगोपाळ पेठेतील काही अपार्टमेंटमध्ये चिकून गुनियासदृश्य आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने आजारी आहेत, असे नागरिक सांगतात. खाजगी रुग्णालयात ते रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, पालिकेकडून धुर फवारणी या परिसरात करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, हिवताप कार्यालयाकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. शहराबरोबरच जिह्यात जानेवारीपासून 30 ऑक्टोबरपर्यंत हिवताप, डेंग्यू, चिकुणगुन्या या आजाराने 557 जण आजारी होते.
सातारा शहरातील समर्थ मंदिर, यादोगोपाळ पेठेच्या काही भागातील कॉलन्या, अपार्टंमेंटमध्ये राहणाऱया नागरिकांमध्ये चिकुणगुन्यासारख्या साथरोग आजाराचा प्रादुभाव वाढल्याचे दिसून येत आहेत. या परिसरातील काही नागरिक आजारी असल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या कॉलन्यांमधील अनेकजण ताप, थंडी आणि हातावर पुरळसारखे उटण्याच्या प्रकाराने आजारी आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने या विभागात धुर फवारणी करावी अशी मागणी होत आहे. साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाकडूनही नागरिकांना कोरडा पाळण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.