प्रतिनिधीसातारा
सातारचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पाहणी करून शहराचा सुधारित आराखडा तयार केला.त्यानुसार गेल्या दोन दिवसांपूर्वी काही प्रमाणात अटी शिथिल करताच सातारा शहरात शनिवारी ही खरेदीसाठी गर्दीच गर्दी दिसत होती.मुख्य बाजारपेठेत किराणा सामान नेण्यासाठी आणि होलसेल मालाची खरेदी करण्यासाठी ही गर्दी झाली होती.लॉक डाऊनच्या काळात दुचाकी जप्त केलेल्याना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.सकाळी 9 पासून काही दुकाने उघडल्याचे चित्र दिसत होते.काही दुकानापुढे लागलेली रांग अन साहित्य नेण्यासाठी चढाओढ दिसत होती.
शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येताच दि.29एप्रिल रोजी पूर्णतः प्रशासनाने लॉक केले होते.त्यामुळे नागरिकांच्या घरात मूलभूत सुविधा संपल्याने तीव्र पडसाद उमटू लागले. प्रशासनाने चांगल्यासाठी लॉकडाऊन कडक केले होते.मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार शहरात मायक्रो कंटेंटमेंट झोन फक्त कडक लॉक डाऊन करत इतर भागात थोडीशी शिथिल करताच गेल्या दोन दिवसांपासून खरेदीसाठी झुंबड उडते आहे.राजवाडा येथील मुख्य बाजार पेठ असलेल्या सदाशिव पेठ, तांदूळ आळी, राजधानी टॉवर येथील किराणा भुसार व होलसेल विक्रीची दुकाने उघडली गेली आहेत.तेथे खरेदीसाठी झुंबड उडत आहे.काही ठिकाणी तर दुकाने कित्येक दिवसांनी उघडल्याने दुकानात उंदराने साहित्याची नासधूस केल्याचे दिसत होते.दुकानाबाहेर साहित्य नेण्यासाठी गर्दी दिसत होते.पोवई नाका परिसरातील कासट मार्केटमध्ये ही किराणा मालाची दुकाने सुरू होती.दुकानदाराकडुन नियोजन केले होते परंतु काही नागरिक आपल्याला साहित्य मिळावे यासाठी धडपड करत होते.त्यामुळे सोशल डिस्टनन्स पाळल्याचे दिसत नव्हते.
डबल सीट नकोच
उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी काढलेला आदेश मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून समस्त सातारकर नागरिकांच्या पर्यंत पोहचला असल्याने घरातून बाहेर पडतानाच सातारकर हे पायी किंवा दुचाकीवर एकटेच बाहेर कामानिमित्त पडत होते.कामाशिवाय बाहेर पडत नव्हते.दुचाकीवर डबल सीट नको उगाच दंडाला कार नको म्हणून एकटेच दुचाकी चालक दौडत होते.
चौकट
जप्त केलेल्या दुचाकी चालकांना नोटिसा
शहरात लॉक डाऊनच्या काळात जे कामानिमित्त आणि जे कामाशिवाय बाहेर पडले त्यांच्या पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या होत्या.काहींच्यावर गुन्हे दाखल केले होते.त्यांना सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याच्यावतीने नोटीस काढण्यात आली आहे.त्यामध्ये नमूद केले आहे की तपासकामी जेव्हा पोलीस बोलवतील तेव्हा हजर व्हा.आपण परस्पर न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा. न्यायालयात बोलवले जाईल तेव्हा हजर रहा.यात कसूर करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे बजवले आहे.त्यातच जप्त केलेली दुचाकी ही पोलीस ठाण्याच्या आवारात असल्याने कशाला त्या वेळी बाहेर पडलो असे नोटीस मिळलालेल्या वाटू लागले आहे.