प्रतिनिधी / सातारा
मागील काही दिवसांप्रमाणे काल ही शहर परिसरास सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली काही ठिकाणी तर 10 ते 15 मिनीटेच तुरळक पाऊस झाला. आधीच लॉकडाऊन त्यात तुरळक पावसाने हजेरी लावल्याने संपर्ण रस्तेच ओस पडले होते.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नियमीत पणे पावसाने हजेरी ही लावलीच. त्यामुळे सध्या वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. या अवकाळी पावसामुळे मात्र भाजी-पाल्याचे नुकसान झाल्याने. सध्या यांच्या दरात देखिल मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या वातावरण बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावरही तितकाच परिणाम होत आहे. आधिच कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे या बदलत्या वातावरणाची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.