आठवडा उलटला तरी पाणीपुरवठा सुरळीत नाही : नागरिकांची गैरसोय, पाण्यासाठी भटकंती
प्रतिनिधी / बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयामध्ये दि. 10 जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, शहर आणि उपनगरात आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे घरात विश्रांती घेणाऱया नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
हिडकल जलाशयामधून पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाने दिली होती. पण आठवडा उलटला तरी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नसल्याने शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरात पाणीपुरवठा बंद होऊन आठवडा झाला तरी पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पण सध्या लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. शास्त्राrनगर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. काही भागात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
शहरात चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पण जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पण दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घरीच थांबावे लागत आहे. परिणामी पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पण पाणी टंचाईमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या शहरासह उपनगरात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. अशातच पाणी समस्या भेडसावत आहे. कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही. मृतांच्या अंत्यविधीकरिता स्मशानभूमीत जागा मिळत नाही, तर घरी बसलेल्या नागरिकांना पाणी मिळणे मुश्कील बनले असल्याने शहरवासियांसमोर समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे विचारणा केली असता, हिडकल जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. पण हिंडलगा पंपहाऊसचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होत असल्याची माहिती दिली. पण पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.