पर्यावरणप्रेमींतून नाराजी : वनखात्याने कारवाई तीव्र करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे वनखात्यामार्फत वृक्ष लागवड करून झाडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे शहरात विनापरवाना झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे शहरातील वृक्षांची संख्या कमी होत आहे. वनखात्याने याबाबत जागृत राहून विनापरवाना झाडे तोडणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खात्यामार्फत दरवषी शहरातील खुल्या जागा, रस्ते, उद्याने आणि इतर ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते. शिवाय झाडांच्या सभोवती कुंपण घालून संरक्षण केले जाते. दरवषी यासाठी खात्यामार्फत मोठय़ा प्रमाणात निधी खर्ची घातला जातो. मात्र याकडे दुर्लक्ष करून काहीजण विनापरवाना वृक्षतोड करत आहेत. शिवाय झाडांच्या फांद्या छाटणीच्या नावाखाली झाडे मुळापासून तोडली जात आहेत. त्यामुळे शहरातील वृक्षांच्या संख्येत घट होत आहे.
परवानगी आवश्यक
शहर आणि उपनगरातील अडचण ठरत असलेली झाडे तोडायची असल्यास वनखात्याची परवानगी आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून काहीजण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विनापरवाना वृक्षतोड करत आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वनखात्याला माहिती द्या
झाडांच्या फांद्या किंवा झाडे तोडताना परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना झाडे तोडताना निदर्शनास आल्यास तातडीने वनखात्याला माहिती द्यावी, बेकायदेशीर झाडे तोडणाऱयांवर कारवाई केली जाते.
शिवानंद मगदूम (आरएफओ वनखाते)