भाजी विक्रेते, फेरीवाल्यांसह नागरिकांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. ढगाळ वातावरणही निर्माण झाले होते. पाऊस पडेल अशी मध्यंतरी शक्मयता निर्माण झाली होती. शनिवारी मात्र अशी कोणतीच पावसाची शक्मयता नसताना अचानकपणे दमदार पावसाचे शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये आगमन झाले. वळिवाच्या या पावसाने साऱयांचीच तारांबळ उडाली. या पावसाने काही ठिकाणी पाणीच पाणी झाले. यामुळे गटारीही तुडुंब भरून वाहत होत्या. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ पाऊस झाला.
शहराच्या तापमानामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. 36 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले होते. शनिवारी दिवसभर अधिक उष्मा जाणवत होता. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. मात्र ढगाळ वातावरण नव्हते. सायंकाळी 7.30 च्या सुमारास अचानकपणे जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. यामुळे बाजारपेठेतील भाजीविपेते, फेरीवाले, दुकानदार यांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुचाकीस्वारांनाही पावसामुळे आडोसा शोधावा लागला. काहीजण पावसात भिजूनच घर गाठताना दिसत होते. पहिलाच दमदार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी गटारीमध्ये कचरा साचून पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत होती. काही ठिकाणी अंधारातून वाट काढत अनेकजण जात होते. त्यामुळे पावसाचा चांगलाच फटका जनतेला बसला आहे.
शहरामध्ये सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. काही ठिकाणी माती रस्त्यावरच टाकून देण्यात आली आहे. त्याठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. काही ठिकाणी खोदाई करून खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये पाणी साचून होते. गटारीतील कचरा रस्त्यावर विस्कटलेला होता. प्लास्टिक तसेच इतर कचरा रस्त्यावर वाहून आला होता. यामुळे दुर्गंधी पसरली होती.
जोरदार वाऱयाने वीजपुरवठा खंडित
शहराच्या पश्चिम भागासह उपनगरांमध्ये जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. वाऱयामुळे झाडाच्या फांद्या विद्युततारांवर कोसळल्या. त्यामुळे शहरातील काही भागाचा वीजपुरवठा 15 ते 20 मिनिटे खंडित झाला होता.
उचगाव, बेकिनकेरे, हिंडलगा परिसरात दमदार पाऊस
शहराच्या पश्चिम भागात हिंडलगा, उचगाव, बेकिनकेरे, मण्णूर यासह इतर गावांमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. कडधान्य पिके, जोंधळा, भाजीपाला यांचे नुकसान झाले. काही शेतकऱयांनी बटाटे काढणीला सुरुवात केली होती. त्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.