प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा बऱयापैकी प्रतिसाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होळी-रंगपंचमीवर मर्यादा
प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसरात रंगपंचमी उत्साहात परंतु मर्यादित स्वरुपात साजरी झाली. राज्य सरकार आणि प्रशासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदाची होळी, रंगमंचमी साधेपणाने साजरी करावी. शक्मयतो आपल्या घरापुरती करावी, सामाजिक अंतराचे भान ठेवावे, असे आवाहन केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला नागरिकांचा बऱयापैकी प्रतिसाद लाभला. तरुणाईने उत्साहात रंगपंचमी साजरी केली.
गोपींचा आवडता कृष्ण आपल्या सवंगडय़ासमवेत पिचकारीने रंगीत पाणी उडवत भ्रमंती करत असे. उन्हाने होणारी लाहीलाही कमी व्हावी हा त्याचा मूळ हेतू. त्याचप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला भगवान शंकराने मदनाला रंगरुपाने जीवंत केले, अशी आख्यायिकासुद्धा आहे. होळीमध्ये वर्षभरातील सर्व कटू घटना आणि कटुता यांचे दहन करायचे आणि रंगाच्या उधळणीने नववर्षाचे स्वागत करायचे हा याचा मूळ हेतु.
दरवर्षी संपूर्ण बेळगाव शहर रंगामध्ये न्हाऊन निघते. तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. साधारण आठवडाभराआधीच तरुणाई रंगांची जमवाजमव करण्यात गर्क असते. वर्षातील हा सुद्धा महत्त्वाचा सण मानला गेला आहे. त्यामुळे परंपरा जपणे महत्त्वाचे असूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होळी आणि रंगपंचमीवर मर्यादा आल्या. तथापि, बालचमू आणि तरुणाईने रंगोत्सवाचा आनंद घेतला. तुलनेने यंदा तरुणी आणि महिलांची संख्या मात्र तुरळक होती. मात्र जेथे डॉल्बी लावली होती तेथे जाऊन पोलिसांनी हस्तक्षेप करुन नियमांकडे बोट दाखवून डॉल्बी ब्ंद करण्यास सांगितली. अर्थात डॉल्बी नसल्याने संगीताच्या आणि ढोलताशांच्या तालावर तरुणाईची पावले थिरकली.
साधारण दुपारी 12 पर्यंत रंगांचा उत्सव सुरू होता. मात्र दरवषी सारखे यंदाच्या रंगपंचमीचे चित्र मात्र निश्चितच नव्हते. दरवषी अपार्टमेंट, मैदाने, टेरेस आणि रस्तोरस्ती तरुण, तरुणींचे थवे रंगपंचमी साजरी करण्यात मग्न असतात. यंदा या सर्व ठिकाणी अत्यंत मर्यादीत स्वरुपात प्रामुख्याने बालचमुंच्या हट्टाखातर आणि तरुणाईच्या हौसेखातर रंगपंचमी साजरी झाली.
सोशल मीडियावर होळीच्या शुभेच्छा होळी व रंगपंचमीच्या निमित्ताने यंदा समाज माध्यमे मात्र अधिक सक्रिय झाली होती. शुक्रवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर होळीच्या शुभेच्छा देण्यात येत होत्या. या शिवाय रंगपंचमीला रंगोत्सवाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. ‘रंगात रंग मिसळले की आणखी छटा निर्माण होतात, माणसांनी माणसांत मिसळले की नाती तयार होतात, नाती टिकवूया, रंगपंचमी साजरी करुया’ किंवा ‘रंग न जाणती जात नी भाषा उधळण करुया चढुदे पेमाची नशा’ अशा अनेक विविध आशयांच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण होत राहिली.