पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला पाऊस
प्रतिनिधी/ बेळगाव
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रविवारी रात्री शहर व तालुक्मयात धो-धो पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गटारी भरून रस्त्यावरून पाणी वाहत होते. रात्री 7.30 नंतर सुरू झालेला पाऊस उशीरापर्यंत सुरूच होता. अचानक पाऊस सुरू झाल्याने व्यापारी व विपेत्यांची तारांबळ उडाली.
गणेशोत्सवापूर्वी बेळगाव शहर व परिसरात मोठा पाऊस झाला होता. त्यानंतर अधुनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यानंतर मध्यंतरी 15 दिवस मोठा पाऊस झाला नव्हता. रविवारी सकाळपासून वातावरणात उष्मा जाणवत होता. दिवसभर कडकडीत उन पडले होते. त्यामुळे पावसाची शक्मयता वर्तविण्यात येत होती. सायंकाळी 7 नंतर शहरात पावसास प्रारंभ झाला. त्यानंतर मोठा पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते.
विजांसह झालेल्या या पावसामुळे शहराच्या बऱयाचशा भागात झाडांच्या फांद्या कोसळल्या. या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने काहीकाळ वीजपुरवठा ठप्प होता. याचबरोबर गटारी तुंबल्याने पाणी साचले होते.
काही काळ वींजपुरवठा ठप्प
विजांच्या कडकडाटानंतर शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. तर काही भागात रात्री उशीरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. वीजपुरवठा नसल्याने नागरिकांना अंधारात रहावे लागले. काही भागात झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशीरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.