प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात काही आंदोलनकर्त्यांचे अलिकडे एकच काम असते की आंदोलन करणे. तेही काही वेळापुरतेच. मग केंद्रातील भाजपा असो किंवा सातारा पालिकेतील खासदार उदयनराजेंची सातारा विकास आघाडी असो. काही संघटनांनी नुकतीच शेतकऱयांच्या बिलाच्या विरोधात आंदोलने केली आहेत. तर आज सातारा पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या विरोधात शहर सुधार समितीने आंदोलन केले.
अलिकडे सातारा शहरात काही संघटना व कार्यकर्त्यांना आंदोलनांशिवाय काहीही सुचत नसते. आंदोलने करताना या संघटनांकडून केंद्रातील वा राज्यातील सरकारने चांगले काम केले तर पेढे वाटल्याचे कधी आनंद साजरा केला नाही. परंतु सातत्याने ह्यांची आंदोलने दिसतील. ती म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय किंवा नगरपालिका कार्यालय. आता तर शेतकऱयांच्या हिताच्या कायद्याच्या विरोधातही ही मंडळी आंदोलन करताना दिसतात. खरा शेतकरी शेतातच राबतोय. शेतकऱयांचे बिल कसे आहे हे फक्त या आंदोलनकर्त्यांनाच माहिती कसे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी काही तासापुरते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. हे आंदोलन करणाऱयांचे बोर्ड मात्र मजेदार होते. टपऱया नको नोकऱया द्या, अशा आशयाचे. त्यांच्या या आंदोलनामुळे पालिकेचे बजेट चर्चेत आले हे मात्र नक्की.