प्रतिनिधी/ बेळगाव
दरवषी प्रमाणे शहापूरच्या ग्रामदेवतांना शुक्रवारी गाऱहाणे घालण्यात आले. आता 5 वार पाळण्यात येणार आहेत. पिक चांगले यावे, धनधान्य अधिक मिळाले, गुराढोरांना रोगराई होवू नये. सर्वांना सुख, शांती मिळावी, असे म्हणत हे गाऱहाणे घालण्यात आले.
शहापूर येथील बसवाण्णा, ब्रम्हदेवता, रेणूका माता, मरगाई देवी, नागदेवता, महालक्ष्मी या मंदिरांमध्ये श्रीफळ ठेवून गाऱहाणे घालून मागणी करण्यात आली. यावेळी सर्व गल्लीतील पंचांतर्फे आरती म्हणण्यात आली. पाच वार पाळल्यानंतर 10 जुलै रोजी सराफ गल्ली, शहापूर येथील मरगाई मंदिरामध्ये प्रसाद वितरीत करण्यात येणार आहे.
यावेळी शंकर बाबली, रमेश चौगुले, सुनील इंजल, सुनील बाबली, अर्जुन लाड, बाळू डवरी, आनंद सुणगार, विनायक चौगुले व इतर गल्लीतील पंच कमिटी उपस्थित होती.