बेळगाव : / प्रतिनिधी
शहापूरच्या शनिवारच्या आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी आणलेल्या विपेत्यांवर पोलिसांनी शनिवारी सौम्य लाठीचार्ज केला. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच भरलेल्या भाजी बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला पहायला मिळाला.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. गर्दी होणाऱया ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंसाठी धावपळ होताना दिसून येत आहे. शनिवारी शहापूर बाजारात शेतकऱयांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. दरम्यान खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून येथील बाजार बंद ठेवण्यात आला होता. मात्र शनिवारी विपेत्यांनी भाजी विक्रीसाठी आणल्यानंतर हा प्रकार घडला. दरम्यान बाजारच बंद करण्यात आल्याने विक्रीसाठी आणलेल्या भाजीचे मोठे नुकसान झाले.
जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला असून सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. गल्ली बोळातून देखील बॅरिकेड्स लावल्याने बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. प्रशासनातर्फे परवानगीशिवाय भाजी विपेते व शेतकऱयांनी भाजीपाला विक्रीसाठी आणू नये, अशा सूचनाही करण्यात आल्या. यावेळी भाजी खरेदी-विक्रीसाठी योग्य वेळ निश्चित करून द्यावा, अशी मागणीही भाजी विपेत्यांतून होत आहे.