शहरात भटकणाऱया कुत्र्यांचा उपदव : नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरांत भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली असून बंदोबस्त करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहरात भटकणाऱया कुत्र्यांचा उपदव वाढला असून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी शहापूर, बसवाण गल्ली येथील तिघांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भटक्मया कुत्र्यांमुळे नागरिकांना रात्रीच्यावेळी बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. प्रत्येक गल्लीच्या कोपऱयावर भटकी कुत्री ठाण मांडून बसत असून रात्रपाळी करून घरी परतणाऱया नागरिकांवर हल्ला करीत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.
कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करा
सोमवारी दिवसभरात बसवाण गल्ली येथील तिघांवर एका कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तिघेजण जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदर कुत्रा येणाऱया-जाणाऱया नागरिकांना हेरून हल्ला करीत असल्याने पिसाळला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.